तिच्यामुळे तो कायम ‘अजिंक्य’

मुंबई तक

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं…मंगेश पाडगावकरांच्या ओळी आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेकदा ऐकल्या असतील. सेलिब्रेटी-क्रिकेटपटू यांच्या परीकथेसारख्या प्रेमकहाण्या आपण वाचल्या आहेत…पण मराठमोळा अजिंक्य रहाणे यासर्वांना अपवाद ठरलाय. पाडगावकरांच्या ओळींसारखी अजिंक्य आणि राधिका यांची लव्हस्टोरी….तुमच्या आमच्यासारखी सेमच आहे. सध्या अजिंक्य ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने उत्तम पद्धतीने संघाची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं…मंगेश पाडगावकरांच्या ओळी आतापर्यंत तुम्ही आम्ही अनेकदा ऐकल्या असतील. सेलिब्रेटी-क्रिकेटपटू यांच्या परीकथेसारख्या प्रेमकहाण्या आपण वाचल्या आहेत…पण मराठमोळा अजिंक्य रहाणे यासर्वांना अपवाद ठरलाय. पाडगावकरांच्या ओळींसारखी अजिंक्य आणि राधिका यांची लव्हस्टोरी….तुमच्या आमच्यासारखी सेमच आहे.

सध्या अजिंक्य ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने उत्तम पद्धतीने संघाची जबाबदारी सांभाळली आहे. गेली काही वर्ष अजिंक्यच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. परंतू काळ खडतर असो किंवा चांगला प्रत्येक वेळी अजिंक्यची बायको राधिका त्याच्यासोबत सावलीसारखी असते. अगदी तुमच्या आमच्यासारखीच असलेली अजिंक्य-राधिकाची मराठमोळी लव्हस्टोरी एकदम आदर्शवत आहे.

अजिंक्य आणि राधिका हे लहानपणापासूनचे मित्र…या दोघांची मैत्री कॉलेजपर्यंत कायम राहिली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही. मुळचा अहमदनगरचा असलेला रहाणे लहानपणी डोंबिवलीत रहायचा. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या अजिंक्यने टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न बाळगलं होतं. राधिकानेही एका उत्तम जोडीदाराप्रमाणे अजिंक्यची साथ दिली. दोघंही प्रेमात पडल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्यांना याची कल्पना दिली. मुंबईच्या संघाकडून स्थानिक क्रिकेट, रणजी अशा स्पर्धांमधून अजिंक्यने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आणि त्याच्यासाठी भारतीय संघाची दारं उघडली.

२६ सप्टेंबर २०१४ रोजी अजिंक्य आणि राधिका विवाहबंधनात अडकले. अजिंक्यच्या लग्नातला एक मजेशीर किस्सा त्याने एका कार्यक्रमात शेअर केला होता. रहाणे आपल्या लग्नाच्या दिवशी नेहमीप्रमाणे टी-शर्ट आणि जिन्स पँटवर राधिकाच्या घरी पोहचला होता. लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अशा अवतारात पाहून राधिका चांगलीच भडकली होती. यानंतर अजिंक्यने लगेचच कपडे बदलत लग्नाचा पेहराव घातला आणि राधिका शांत झाली. आपल्या आयुष्यातली ही सर्वात मोठी चूक असल्याचं अजिंक्यने सांगितलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp