चुकूनही पाकिस्तानात जाणार नाही, इंग्लंडचा खेळाडू एअरपोर्टवर ढसा ढसा का रडला?
India Pakistan ceasefire : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, दोन्ही देशांमधील क्रिकेट लीग स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने त्या खेळाडूंना यूएईला पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅरिल मिशेलने पुन्हा पाकिस्तानला जाणार नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वात जास्त भावनिकरित्या प्रभावित झालेल्यांपैकी, इंग्लंडचा खेळाडू रडत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, दोन्ही देशांमधील क्रिकेट लीग स्थगित करण्यात आल्या होत्या

पाकिस्तानने त्या खेळाडूंना यूएईला पाठवण्यात आलं होतं

परिस्थिती पाहता इंग्लंडच्या खेळाडूला अश्रू अनावर
India pakistan ceasefire : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान युद्धाला 86 हून अधिक तास झालेत. यामुळे दोन्ही देशातील सुरू असणाऱ्या T20 प्रिमीयर लीग स्थगित करण्यात आल्यात. या युद्धादरम्यान, पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळत होती. या संकटकाळात बांगलादेशचा फिरकीपटू गोलंदाज रिशान हुसैननं खुलासा केला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या डॅरिल मिशेलनं पुन्हा पाकिस्तानात जाणार नसल्याची भावना व्यक्त केलीय. अशातच इंग्लंडच्या खेळाडूला रडू कोसळल्याची माहिती आता समोर येत आहे.
हेही वाचा : "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल
नेमकं काय घडलं?
भारत पाकिस्तान दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाकिस्तानातील पीसीएल आणि भारताची आयपीएल अशा दोन्ही लीग स्थगित करण्यात आल्या. यानंतर पीएसएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना युएईमध्ये हलवण्यात आले.
दरम्यान, सॅम बिलिंग्ज, डॅरेल मिशेल, कुशर परेरा, डेव्हिड विस, टॉम करन असे काही खेळाडू घाबरले होते, असे रिशादनं क्रिकबझला सांगितलं. परिस्थिती संवेदनशील असताना न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलनं मी पुन्हा कधीही पाकिस्तानात जाणार नाही, असं म्हणत त्यांनं आपली भावना व्यक्त केली.
इंग्लंडचा खेळाडू ढसाढसा रडू लागला म्हणाला...
संवेदनशील परिस्थितीत इंग्लंडचा टॉम करन एअरपोर्टवर पोहोचला असताच त्याला रडू कोसळलं. यावर रिशादनं भाष्य करत टॉम करन हा लहान मुलांसारखा रडू लागला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याची समजूत काढण्यासाठी काही खेळाडूंनी त्याला शांत केलं, असे रिशादनं सांगितलं.
हेही वाचा : 'पाकिस्तान ऐकायला तयार नाही हल्ला सुरूच, आता आम्ही...', Army ला थेट कारवाईचे आदेश
त्यानंतर पुढे रिशाद म्हणाला की, "आम्ही एका संकटावर मात करून दुबईला पोहोचलो. त्यानंतर मला बरं वाटू लागलं. आम्ही निघाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनंतर विमानतळावर क्षेपणास्त्रांचा आवाज येत होता. हे अगदीच काळीज हेलावून टाकणारं होतं." दरम्यान, 10 मे 2025 रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीविषयी सकारात्मक बाजू दिसून आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवरील काही भागांमध्ये युद्धाला स्थगिती मिळाल्याचं सांगण्यात येतंय.