IND Vs SL T20: भारताने श्रीलंकेला पहिल्याच T-20 सामन्यात नमवलं, 1-0 ने मालिकेत आघाडी

मुंबई तक

लखनऊ: लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी दणदणीत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 137 धावाच करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा हा सलग दहावा T20 विजय आहे. तसंच कर्णधार रोहित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लखनऊ: लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी दणदणीत पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ 137 धावाच करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा हा सलग दहावा T20 विजय आहे. तसंच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील देखील टीम इंडियाचा हा सलग दहावा T20 विजय आहे. आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला त्याच्या आजच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

इशान-श्रेयसची तुफानी फलंदाजी

टीम इंडियासाठी सलामीवीर इशान किशनने 89 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत 111 धावांची सलामी भागीदारी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेल्या संधीचा फायदा इशान किशनला करता आला नाही. अशा स्थितीत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र यावेळी त्याने आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध करुन दाखवली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp