तो एक कॅच अन् थेट कर्णधार, हार्दिकला मागे सारून सूर्यकुमार कसा बनला Captain? वाचा Inside Story

मुंबई तक

India vs Srilanka : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेचे नेतृत्त्व अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा करणार आहे. मात्र टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्यकुमारची कर्णधारपदी का निवड झाली?

point

ऋतुराज आणि अभिषेक संघातून बाहेर का ?

point

विराट-रोहित आणि बुमराहबद्दल गंभीर काय म्हणाला?

Hardik vs Suryakumar : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेचे नेतृत्त्व अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा करणार आहे. मात्र टी 20 क्रिकेटमधून रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्याने आता टीम इंडियाला  सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे. तसेच, या दौऱ्याने टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होत आहे. (india vs srilanka how did suryakumar yadav become captain after beating hardik pandya know the inside story)

पण, यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी भारतीय क्रिकेट आणि सूर्यकुमार यादवच्या निवडीसंबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.

हेही वाचा : New Tax Regime 2024 : नव्या आयकर रचनेमुळे तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार?

सूर्यकुमारची कर्णधारपदी का निवड झाली?

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, 'सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. तो सर्वश्रेष्ठ T20 फलंदाजांपैकी एक आहे. हार्दिक पांड्याचा फिटनेस आव्हानात्मक ठरला आहे. हार्दिक हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. निवडक (सिलेक्टर) / प्रशिक्षकांसाठी त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे कठीण होऊन जाते. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.'

ऋतुराज आणि अभिषेक संघातून बाहेर का ?

ऋतुराज आणि अभिषेकला संघातून वगळण्यात आल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, 'संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप वाईट वाटेल. रिंकूकडेच बघा, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याने खूप चांगली कामगिरी केली होती, पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. आम्ही फक्त 15 खेळाडूच निवडू शकतो.'

हे वाचलं का?

    follow whatsapp