IPL 2021 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने चाखली विजयाची चव, पंजाबचा ६ विकेटने पराभव

मुंबई तक

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात युएईमध्ये सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा विजयाची चव चाखली आहे. पंजाबकिंग्ज संघावर ६ विकेटने मात करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं आहे. टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईविरुद्ध सामन्यासाठी पंजाबने संघात काही महत्वाचे बदल केले होते. लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या मनदीप सिंगने चांगली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात युएईमध्ये सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा विजयाची चव चाखली आहे. पंजाबकिंग्ज संघावर ६ विकेटने मात करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं आहे.

टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईविरुद्ध सामन्यासाठी पंजाबने संघात काही महत्वाचे बदल केले होते. लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या मनदीप सिंगने चांगली सुरुवातही करुन दिली. परंतू कृणाल पांड्याने पंजाबची सलामीची जोडी फोडली. यानंतर मैदानावर आलेला ख्रिस गेलही फारशी चमक दाखवू शकला नाही. पोलार्डने त्याला एक रनवर आऊट केलं. लागोपाठ कॅप्टन लोकेश राहुलही पोलार्डच्या जाळ्यात अडकला.

पंजाबची ही घसरगुंडी पुढे कायम राहिली. जसप्रीत बुमराहने निकोलस पूरनला आऊट करत पंजाबच्या अडचणींमध्ये भर घातली. परंतू यानंतर एडन मार्क्रमने दीपक हुडाच्या साथीने फटकेबाजी करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मुंबईकडून पोलार्ड आणि बुमहारने प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्या आणि चहने १-१ विकेट घेतली.

IPL 2021 : 10 हजार रन्स, 300 विकेट, पोलार्डचा टी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

हे वाचलं का?

    follow whatsapp