IPL 2022 MI : मुंबई इडियन्सच्या खेळाडूंना नीता अंबानी फोन करून काय म्हणाल्या?

मुंबई तक

आयपीएलचं सलग पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्ससाठी १५व्या हंगामाची सुरूवात, मात्र निराशाजनक राहिली आहे. मुंबई इडियन्सला सलग चार पत्करावे लागले आहेत. सध्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना चक्क नीता अंबानी यांनीच फोन केला. खेळाडूंशी संवाद करतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिली मॅच गमावल्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलचं सलग पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इडियन्ससाठी १५व्या हंगामाची सुरूवात, मात्र निराशाजनक राहिली आहे. मुंबई इडियन्सला सलग चार पत्करावे लागले आहेत. सध्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना चक्क नीता अंबानी यांनीच फोन केला. खेळाडूंशी संवाद करतानाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिली मॅच गमावल्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर झालेल्या तीनही सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही खंत व्यक्त केली होती.

या पराभवानंतर मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या नीता अंबानी खेळाडूंशी संवाद करताना पाहायला मिळत आहे. नीता अंबानी या फोनवरून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा आत्मविश्वार वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

नीता अंबानींनी खेळाडूंना काय दिला संदेश?

हे वाचलं का?

    follow whatsapp