यंदा IPL 2022 मुंबई-पुण्यात! काय आहे BCCI ची तयारी?
काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव बंगळुरुत पार पडला. ज्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या तर काहींच्या पदरात निराशा पडली. २६ मार्चपासून आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होणार आहे आणि हा संपूर्ण हंगाम यंदा भारतातच खेळवला जाईल असं बीसीसीआयने जाहीर केलंय. आता संपूर्ण हंगाम बीसीसीआय जर भारतात खेळवणार असेल तर कोरोना आणि त्यानिमीत्ताने येणाऱ्या सर्व बंधनांचं […]
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव बंगळुरुत पार पडला. ज्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या तर काहींच्या पदरात निराशा पडली. २६ मार्चपासून आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होणार आहे आणि हा संपूर्ण हंगाम यंदा भारतातच खेळवला जाईल असं बीसीसीआयने जाहीर केलंय.
आता संपूर्ण हंगाम बीसीसीआय जर भारतात खेळवणार असेल तर कोरोना आणि त्यानिमीत्ताने येणाऱ्या सर्व बंधनांचं काय? हा प्रश्न साहजिकच क्रिकेटप्रेमींच्या मनात येणं साहजिक आहे. बीसीसीआयने यंदाच्या हंगामात कोरोनामुळे स्पर्धा मध्यावधीत स्थगित करायला लागू नये आणि खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये तसेच सध्याच्या खडतर काळात खेळाडूंना जास्त प्रवास करायला लागू नये म्हणून यंदाचं आयपीएल मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच आयोजित करण्याचं ठरवलं आहे.
IPL 2022: बोली लावली मुंबईने खेळाडू विकला दिल्लीला, लिलावात चारु शर्मांचा घोळ पाहिलात का?
आयपीएलसाठी बीसीसीआयने या दोन शहरांचीच का निवड केली आणि काय असणार आहे BCCI चा प्लान हे आज जाणून घेणार आहोत.