Kapil Dev, झहीर खान यांचे विक्रम ‘हा’ बॉलर मोडणार; बड्या क्रिकेटरने सांगितलं नाव
Border-Gavaskar trophy : इंदौर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील कसोटी भारताने (India) सहा गडी राखून जिंकली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. शिवाय पहिल्या कसोटीतही भारतीय गोलंदाजांनी मोठं योगदान दिलं. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) उस्मान […]
ADVERTISEMENT

Border-Gavaskar trophy :
इंदौर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील कसोटी भारताने (India) सहा गडी राखून जिंकली. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. शिवाय पहिल्या कसोटीतही भारतीय गोलंदाजांनी मोठं योगदान दिलं. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) उस्मान ख्वाजाला पायचीत केलं होतं. यामुळे टीम इंडियाला (Team India) दमदार सुरुवात झाली होती. तोच वेग आजही कायम आहे. (Border-Gavaskar trophy | Mohammad Siraj can become a bowler who can take 300 Test wickets for India if he stays fit)
अशातच क्रिकबझच्या ‘राईज ऑफ न्यू इंडिया’ शोमध्ये बोलताना भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने मोहम्मद सिराजबाबत मोठं वक्तव्य केलं. कार्तिक म्हणाला की, मोहम्मद सिराज अजूनही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी चिंतेचा विषय आहे. शिवाय तो दुरुस्त राहिल्यास भारतासाठी कसोटीत ३०० विकेट्स घेऊ शकणारा गोलंदाज होऊ शकतो. मला खात्री आहे की तो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप संघाचा भाग असेल. त्याने आपलं स्थान पक्क केलं आहे. मागील काही काळात तो उत्कृष्ट क्रिकेट खेळला आहे. २०२२ च्या आयपीएलने अपयश कसं हाताळायचं हे शिकवलं आहे. याचा त्याला खूप फायदा झाला आहे.
Crime: गर्लफ्रेंडला मेसेज… मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् ह्रदय काढलं बाहेर