प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचं श्रीलंकेत यशस्वी होणं टीम इंडियासाठी आहे गरजेचं, कारण…

मुंबई तक

इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय चाहते नाराज आहेत. विराट कोहली आणि रवी शास्त्री जोडगोळीचे प्लान्स नेमके अंतिम सामन्यात कसे फेल जातात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. अनेकांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी केली. जुलै महिन्यात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय चाहते नाराज आहेत. विराट कोहली आणि रवी शास्त्री जोडगोळीचे प्लान्स नेमके अंतिम सामन्यात कसे फेल जातात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. अनेकांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी केली.

जुलै महिन्यात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जातो आहे. अनेकांनी भारतीय संघाची सूत्र राहुल द्रविडच्या हाती देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने श्रीलंकेत आश्वासक कामगिरी करुन दाखवली तर भविष्यकाळात रवी शास्त्रींसाठी ही धोक्याची घंटा समजली जाऊ शकते.

India Tour of Sri Lanla : राहुल द्रविडसोबत माजी मुंबईकर खेळाडू करणार टीम इंडियाला मार्गदर्शन

प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींची कामगिरी उल्लेखनीय असली तरीही संघाला विजेतेपद मिळवून देण्यात ये अयशस्वी ठरलेत हे सत्य देखील तितकंच खरं आहे. आजही भारतीय संघात अनेक उणीवा बाकी आहेत ज्याची उत्तर आपल्याला मिळालेली नाहीत. परंतू दुसरीकडे राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून कामगिरी ही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडसारख्या व्यक्तीला टीम इंडियाची सूत्र हाती देणं हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp