Virat Kohli vs Gautam Gambhir : वादावर कोहलीने सोडलं मौन; पोस्टमध्ये काय?
विराट कोहलीची ही पोस्ट आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या वादानंतरची आहे.
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघेही ट्रेंडिंगमध्ये आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांमधील वादाच्या इतिहास पुन्हा समोर आला. बीसीसीआयने दोघांना सामन्याच्या मानधनावर 100 टक्के दंड आकारला. दोघांमधील वादावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना विराट कोहलीने मौन सोडलं आहे. विराटने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. आयपीएल कोड ऑपफ कंडक्ट म्हणजे आयपीएलच्या शिस्तीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा दोघांनाही बीसीसीआयने त्यांच्या मॅच फीसमधून 100 टक्के दंड ठोठावला आहे.
गौतम गंभीरसोबत वाद झाल्यानंतर कोहली काय म्हणाला?
विराट कोहलीने गौतम गंभीरसोबत वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये विराट कोहलीने म्हटलं आहे की, आपण जे काही ऐकतो ते मत असत, सत्य नाही. तसंच जे काही आपण बघतो तो एक दृष्टिकोण असतो, सत्य नसतं.”
नवीन उल हकनंतर गौतम गंभीरसोबत वाद
विराट कोहलीची ही पोस्ट आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या वादानंतरची आहे. विराट कोहलीचा सामना दरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकसोबत वाद झाला होता.










