Akshay Gawate : महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण! कुटुंबाला खरंच 1 कोटी 13 मिळणार?

भागवत हिरेकर

23 Oct 2023 (अपडेटेड: 23 Oct 2023, 10:22 AM)

agniveer akshay gawate death : बुलढाणा जिल्ह्यातील अग्रिवीर अक्षय गवते यांना सिचाचीनमध्ये वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून १ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत केली जाणार आहे.

Indian Army soldier Akshay Laxman Gavate, posted in Siachen, Ladakh, is the first Agniveer to be martyred while deployed on the line of duty.

Indian Army soldier Akshay Laxman Gavate, posted in Siachen, Ladakh, is the first Agniveer to be martyred while deployed on the line of duty.

follow google news

Agniveer Akshay Laxman Gawate Death Reason : जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. देशाचे रक्षक करत असताना शहीद झालेले अक्षय लक्ष्मण गवते हे पहिले अग्निवीर आहेत. जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. त्यांच्या निधनानंतर अग्निवीरांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा आणि आर्थिक मदतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांनी अग्निवीर योजनेवरून टीका केली आहे. दरम्यान, शहीद अग्रिवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला किती मदत मिळणार हेच जाणून घेऊयात…

हे वाचलं का?

लष्कराच्या लेहस्थित फायर अँड फ्युरी कॉर्प्सने रविवारी सांगितले की, सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते शहीद झाले. शहीद अक्षय गवते यांच्या निधनाबद्दल लष्कराने शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम कशी मिळणार हे सांगितले आहे.

अक्षय गवते सियाचीनमध्ये होते तैनात

गवते हे काराकोरम पर्वतरांगातील 20,000 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तैनात होते. या ग्लेशियरला जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. इथे सैनिकांना जोरदार बर्फाळ वाऱ्याचा सामना करावा लागतो. हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्लेशियर आहे.

हे ही वाचा >> Parag Desai Dies: धक्कदायक! Wagh Bakri चहा मालकाचा मृत्यू, भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव

शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला नक्की किती पैसे मिळणार?

शहिदांच्या कुटुंबीयांना द्यावयाच्या भरपाईबाबत लष्कराने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. ‘अग्नवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या दु:खद प्रसंगामध्ये भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबाबत सोशल मीडियावरील विरोधाभासी संदेश लक्षात घेता, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की नातेवाईकांना मिळणारे रक्कम सैनिकाच्या संबंधित अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जाते.’

अग्निवीरांच्या नियुक्तीच्या अटींनुसार, हुतात्मासाठी अधिकृत रक्कम खालीलप्रमाणे असेल :-

– नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स रक्कम रक्कम 48 लाख रुपये.

– अग्निवीरने (30%) योगदान दिलेले सेवा निधी, सरकारच्या समान योगदानासह, आणि त्यावर व्याज.

– 44 लाख रुपये सानुग्रह.

– मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचा देय (तत्काळ प्रकरणात ₹13 लाखांपेक्षा जास्त).

– आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड मधून 8 लाख रुपये निधी.

– AWWAकडून (तत्काळ आर्थिक मदत ) तात्काळ ₹ 30 हजारांची आर्थिक मदत.

राहुल गांधींनी अग्निवीर योजनेला म्हटले अपमान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. अग्निवीर योजना हा भारतातील वीरांचा अपमान करण्याचा प्लॅन असून अग्निवीराच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन किंवा इतर सवलती दिल्या जात नाहीत, असे ते म्हणाले होते. राहुल गांधींचे आरोप भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे फेटाळून लावले. “हे आरोप पूर्णपणे निराधार आणि बेजबाबदार आहेत”, अशी टीका आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी केली.

भाजपचा पलटवार

ते म्हणाले, ‘अग्नीवीर गवते अक्षय लक्ष्मण यांनी देशाची सेवा करताना आपला जीव गमावला आहे आणि त्यामुळे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेला सैनिक म्हणून नुकसान भरपाई मिळण्याचा ते हक्कदार आहे. अक्षय गवते यांच्या कुटुंबाला 48 लाख रुपयांचा विना-सहयोगी विमा, 44 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम, अग्निवीरने योगदान दिलेला सेवा निधी (30 टक्के), तसेच सरकारच्या समतुल्य योगदानासह आणि त्यावरील व्याजाची रक्कम मिळेल. ..’

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘ती’ जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट, 24 तासांत डॅमेज कंट्रोल?

मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “म्हणून खोट्या बातम्या पसरवू नका. तुम्ही पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगता, प्रयत्न करा आणि तसे वागा.”

    follow whatsapp