मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान अंदाज संस्थांच्या माहितीनुसार आज (26 जून) रोजी महाराष्ट्रात मान्सूनच्या जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल.
ADVERTISEMENT
विभागनिहाय हवामानाचा अंदाज
- कोकण आणि घाटमाथा (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग):
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम सरींसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 100-150 मिमी पर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
समुद्राला मोठी भरती येणार असल्याने किनारपट्टीवरील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: गणपती मंडळांना बाप्पा पावणार का? सगळंच खोळंबलंय.. कोर्टाच्या निकालाकडे डोळे!
- पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर):
पुणे आणि सातारा घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुण्यात 40-120 मिमी पाऊस अपेक्षित आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- मराठवाडा (बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव):
मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. बीड, नांदेड आणि हिंगोलीमध्ये रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो. धाराशिव आणि लातूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
- विदर्भ (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया):
विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपुरात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमी राहील, ज्यामुळे काही ठिकाणी वादळी वातावरण निर्माण होऊ शकते.
हे ही वाचा>> मुंबईकरांनो सावधान... पुढच्या 5 दिवसात सलग येणार समुद्राला मोठी भरती, तुफान पाऊस बरसला तर...
- उत्तर महाराष्ट्र (नाशिक, धुळे, जळगाव):
नाशिक आणि धुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर जळगावमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक सरी पडू शकतात.
हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा.
हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
