Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान विभागाने हवामानाचा सविस्तरपणे अंदाज वर्तवला आहे. हवामानाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मे 2025 मध्ये मान्सून लवकर दाखल झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. अशातच आता हवामान खात्याने 19 जून रोजी पावसाच्या एकूण परिस्थिच्या अंदाजाची माहिती दिली आहे. त्याची एकूण माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...
कोकण
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने रायगड आणि मुंबई परिसरात वेगाने वारे आणि मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुण्याला येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच ढगाळ वातावरण राहून वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ढगाळ वातावरण निर्माण होणार असून तापमान मध्यम राहिल.
विदर्भ
विदर्भात मान्सूनचा जोर कमीच असेल. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. काही भागात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पण मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
तर खांदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मान्सून अद्यापही सक्रिय झालेला नाही, अशी हवामान खात्याने माहिती दिली आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी उष्ण वातावरण राहणार आहे. याचपार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊयात.
हेही वाचा : पती बनवत बसला हनिमूनचा प्लॅन, पत्नीचं सुरू होतं भलतीकडेच गुटर गुटर; बॉयफ्रेंडला बोलावलं अन्..
सावधगिरी बाळगावी
कोकण आणि मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सखलभागात पाणी साचण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर वाहतूकीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणीही समुद्रकिनारी जावू नये असा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजांचा कडकडाट अपेक्षित असल्याने सावधगिरी बाळगावी, असा हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
