पती बनवत बसला हनिमूनचा प्लॅन, पत्नीचं सुरू होतं भलतीकडेच गुटर गुटर; बॉयफ्रेंडला बोलावलं अन्..

मुंबई तक

Crime News : नवविवाहित तरुणीने आपलं सासर सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. ती केवळ नऊच दिवस तिच्या सासरी राहिली आणि नंतर तिने तिचा मार्ग निवडत सासरहून पळ काढला. त्यानंतर तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

 extra marrital affairs
extra marrital affairs
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीने आपलं सासर सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

point

पतीने पत्नीचेच मानले आभार

Crime News : उत्तर प्रदेशातील बिदायूमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणीने आपलं सासर सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. ती केवळ नऊच दिवस तिच्या सासरी राहिली आणि नंतर तिने तिचा मार्ग निवडत सासरहून पळ काढला. त्यानंतर तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर तरुणाने सुटकेचा श्वास घेत तिचे आभार मानले आहेत. बरं झालं नाही,तर माझे राजा रघुवंशीसारखे हाल झाले असते, असं पती म्हणाला. 

हेही वाचा : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...

नेमकं काय घडलं?

ही घटना बिसौली ठाणे क्षेत्रातील आहे. सुनीलचा खुशबू नावाच्या तरुणीशी 17 मे रोजी विवाह झाला होता. 18 मे रोजी महिला तरुणी आपल्या सासरी गेली. लग्नानंतर नऊ दिवस ती आपल्या सासरी राहिली होती. त्यानंतर तिला रितीरिवाजानुसार काही दिवस माहेरी पाठवलं होतं. मात्र दहाव्या दिवशी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. 

पती सुनीलने पत्नी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशावेळी पोलीस तिचा शोध घेऊ लागले होते. सोमवारी महिलेनं पोलीस ठाणे गाठल्यानंतर मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना समजावले. त्यानंतर लग्नासोहळ्यात ज्या वस्तू देण्यात आल्या होत्या, त्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कोणीही एकमेकांवर कारवाईची मागणी केली नाही. 

तिने राजा रघुवंशीसारखे माझे हाल केले नाहीत

यावेळी पती सुनीलने सांगितलं की, मी हनिमूनला जाण्याचे नियोजन केलं होतं. जर तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असेल तर मी खूशच आहे. मी नशीबवान आहे कारण तिने राजा रघुवंशीसारखे माझे हाल केले नाहीत. 

हेही वाचा : घोर कलियुग! लग्नानंतर बायकोने बॉयफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो नवऱ्याला पाठवले अन्...

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, नवविवाहित तरुणी ही पोलीस ठाण्यात आली होती. अशावेळी तिने बॉयफ्रेंडसोबत राहणार असल्याचं सांगितलं. ती कोणाचंही ऐकत नव्हती. मग अशावेळी दोघांनी एकमेकांना विवाहसोहळ्यात दिलेल्या वस्तू परत केल्या. यानंतर तरुणी बॉयफ्रेंडसोबत गेली आणि पुरूषाचे कुटुंब त्यांच्या घरी निघून गेले.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp