Maharashtra Weather Update : हवामान विभागाने 23 जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD)नुसार मान्सून हा 2025 मे महिन्याच्या अखेरीस सक्रिय झाला. विशेष करुन कोकणभाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 23 जूनच्या पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत, त्याबाबत आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'जर कोणाला सांगितलं तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल...' महिला शिक्षिकेला तरुणांनी फ्लॅटवर नेलं अन्...
कोकण
हवामान विभागाने कोकणात 23 जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात पाऊस मुसळधार असेल. पुणे आणि सातारा घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगावी. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगावी असा हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून वादळी वारे वाहू लागतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, विशेष म्हणजे उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड येथे पावसाचे प्रमाण कमी राहिल. तर दक्षिण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशीवमध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. तसेच या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसह ढगाळ वातावरण रहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
विदर्भ
विदर्भातील पूर्वभागात म्हणजेच नागपूर, चंद्रपूर येथे पावसाची शक्यता आहे. अमरावती आणि अकोल्यात काही अंशी पाऊस असेल. अमरावती आणि अकोल्याच्या तुलनेत नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पाऊस अधिक असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
दरम्यान, संबंधित पावसाची परिस्थिती पाहता, पावसाचा जोर लक्षात घेता, पेरणीची घाई करू नये. तसेच सांगली, कोल्हापूर आणि ग्रामीण पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
हेही वाचा : महिलेला घरी जाण्यासाठी पतीनं बुक केली कॅब, ड्रायव्हरने दोन प्रवाशांना गाडीत घेतलं, मुंबईत 'त्या' रात्री महिलेसोबत..
मुंबईत पाणी साचण्याची शक्यता
मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूर, भूस्खलन धोका निर्माण होईल. अशा परिस्थितीत नागरिकांना प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच मुंबईतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा वाहतूक आणि आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. यासाठी सोबत छत्री किंवा रेनकोट ठेवावा.
ADVERTISEMENT
