पुण्यात काही तरी भलतंच... पिझ्झा ऑर्डर केला म्हणून मुलींना काढलं वसतिगृहातून बाहेर

ओमकार वाबळे

• 12:46 AM • 11 Feb 2025

पुण्यातील एका वसतिगृहात पिझ्झा मागवल्याने 4 मुलींना शिक्षा म्हणून एका महिन्यांसाठी वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं आहे.

 पिझ्झा ऑर्डर केला म्हणून मुलींना काढलं वसतिगृहातून बाहेर

पिझ्झा ऑर्डर केला म्हणून मुलींना काढलं वसतिगृहातून बाहेर

Google CTA

पुणे: पुण्यातील एका वसतिगृहात एक विचित्र घटना समोर आली आहे, जिथे चार विद्यार्थिनींना ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहातून त्यांना चक्क काढून टाकण्यात आलं आहे. पुण्यातील मोशी येथे समाज कल्याण वसतिगृह आहे जिथे सुमारे 250 मुली राहतात आणि शिक्षण घेतात.

हे वाचलं का?

पुणे येथील मोशी येथे असलेले समाज कल्याण वसतिगृह सामाजिक न्याय विभागाद्वारे चालवले जाते. अहवालानुसार, वसतिगृह वॉर्डन मीनाक्षी नरहरे यांना एका विद्यार्थिनीच्या खोलीत ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर करण्यात आल्याची माहिती मिळाली. जेव्हा त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना याबद्दल विचारणा केली तेव्हा सर्वांनी ते नाकारले. असे असूनही, वॉर्डनने विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली आणि त्या चौघींनाही एका महिन्यासाठी वसतिगृहातून निलंबित केले.

हे ही वाचा>> 'तिने अंगठी खाल्ली...' केकमध्ये लपवलेली सोन्याची अंगठी, प्रेयसीने ती खाल्ली अन्...

पालकांना बोलावून केले अपमानित 

वादात आणखी भर घालत, वसतिगृह प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांनाही बोलावून त्यांच्या मुलींनी केलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांनीही अपील केले, परंतु अधिकाऱ्यांनी कोणताही दिलासा दिला नाही आणि विद्यार्थींनींना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा>> Pune Crime: पुण्यात खळबळ! वाहतूक पोलिसाच्या डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात नेमकं घडलं तरी काय?

नोटीस बजावली

वसतिगृह प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी या प्रकरणी अधिकृत सूचनाही जारी केली होती. नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, जर 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणत्याही विद्यार्थींनींनी वसतिगृहात पिझ्झा कोणी ऑर्डर केला होता हे सांगितले नाही तर चारही विद्यार्थींनींना एका महिन्यासाठी बाहेर काढले जाईल.

विद्यार्थिनींचे भविष्य धोक्यात!

महिला विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. समाज कल्याण वसतिगृह आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून राहण्याची व्यवस्था करते. अशा परिस्थितीत, अशा कठोर निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागू शकतो.