गणेश जाधव, धाराशिव: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेबाबत देशासह संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (14 जून) पूर्ण दिवसभरासाठी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले हॉटेलच्या मालक?
"शिकलेलो नसलो तरी माणुसकी आहे. जे प्रवासी आपल्या आप्तांना पाच-सहा वर्षांनी भेटण्यासाठी निघाले होते, त्यांचा मृत्यू ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही आज आमचं हॉटेल बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत."
हे ही वाचा>> "खचून जाऊ नका...", हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, हॉटेल तिरंगाच्या मालकाचा सपोर्ट, म्हणाले...
ही घटना समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांनी हॉटेलच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. "व्यवसायापेक्षा माणुसकी मोठी," अशा स्वरुपाच्या कमेंट सोशल मीडियावर यावेळी पाहायला मिळत आहे.
"हॉटेल भाग्यश्री बंद...", म्हणून टोळक्याने केलेली तोडफोड
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळी हॉटेल भाग्यश्री बंद असल्याच्या कारणावरून एका टोळक्याने तोडफोड केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात हॉटेलचे बॅनर आणि बोर्ड फाडण्यात आले होते. ज्यामुळे, सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.
हे ही वाचा>> "हॉटेल भाग्यश्री आज बंद...", म्हणून टोळक्याकडून तोडफोड, 70 हजारांचं नुकसान, मालक म्हणाले आता...
“हॉटेल भाग्यश्री आज 10 जून रोजी उघडणार होतं, पण काल रात्री अचानक दगडफेक झाली. बॅनर व बोर्ड फाडले गेले. त्यामुळे हॉटेल काही काळासाठी बंद ठेवावं लागलं. पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.” असं म्हणत हॉटेल मालक मडके यांनी या घटनेमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
