Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे कडाडले

भागवत हिरेकर

03 Oct 2023 (अपडेटेड: 03 Oct 2023, 07:26 AM)

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात १२ बालकांचा समावेश आहे. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला फटकारले आहे.

patients died in nanded hospital : MNS chief Raj Thackeray attacked on Eknath shindd, Devendra Fadnavis And Ajit Pawar. Maharashtra

patients died in nanded hospital : MNS chief Raj Thackeray attacked on Eknath shindd, Devendra Fadnavis And Ajit Pawar. Maharashtra

follow google news

Nanded Hospital news in marathi : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधी 24 तर नंतर 7 अशा तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यू तांडवाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ३१ रुग्णांच्या मृत्यूवरून राज ठाकरेंनी सरकारवरचा ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. (MNS Chief Raj Thackeray First Reaction on patient death in Nanded hospital)

हे वाचलं का?

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूबद्दल राज ठाकरेंनी दुःख व्यक्त केले आहे. राज ठाकरेंनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे घडलेल्या घटनेचाही उल्लेख केला आहे. “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली.”

औषध तुटवड्यावर राज ठाकरेंचं बोट

“राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत”, असं सांगत राज ठाकरेंनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.

हेही वाचा >> Nanded : आधी ठाण्यात, आता नांदेडला ‘मिंधे सरकार’…,नांदेड मृत्यू प्रकरणात ठाकरेंचा संताप

राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समाचार घेतला. राज ठाकरेंनी म्हटलंय की,”तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल, तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?”, असा सवाल करत राज यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांना कोंडीत पकडलं.

हेही वाचा >> विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तुटण्याचा धोका? समजून घ्या 5 संकेतांचे अर्थ

स्वतःचं आयुर्मान वाढवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या आरोग्याकडे लक्ष द्या

सध्या आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार अपात्रता प्रकरणात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास काय करायचे याबद्दल चर्चा झाली. याच अनुषंगाने राज ठाकरेंनी शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहे.”दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं”, असा हल्ला राज ठाकरेंनी केला आहे.

    follow whatsapp