प्रेमात विश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. प्रेमात जर विश्वासालाच तडा गेला तर ते नातं संपण्याच्या मार्गावर येतं. प्रियकर आणि प्रेयसी असो किंवा नवरा आणि बायको असो, नात्यात मिळालेला धोका हे जीवनातील मोठ्या दु:खापेक्षा कमी नाही.
ADVERTISEMENT
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील नॅशनल ओपिनियन रिसर्च सेंटर (NORC) च्या 2022 मधील ग्लोबल सोशल सर्व्हे (GSS) मध्ये अशाच काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. या सर्वेक्षणादरम्यान, 20 टक्के पुरुष आणि 13 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदारांची फसवणूक केल्याचे कबूल केले.
सर्वेक्षणातील आकडेवारी
याव्यतिरिक्त, 20219 च्या ब्रिटिश संशोधन आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म YouGov ने 1 हजारहून अधिक विवाहित लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातही असेच परिणाम समोर आले. यापैकी 20 टक्के पुरुष आणि 10 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे कबूल केले.
गेल्या काही दशकांमध्ये, आपल्या जोडीदाराला धोका देणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2010 मध्ये, पत्नींमध्ये पतींना फसवण्याची प्रवृत्ती 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. या आकडेवारीनंतर एकच प्रश्न उभा राहतो, महिला पुरुषांची फसवणूक का करतात?
हे ही वाचा: CRPF जवानाचं पाकिस्तानी महिलेशी लग्न, माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पदावरुन बडतर्फ, जवान म्हणाला, मी...
1. एकटेपणा
स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. यामुळे जर त्या आपल्या जोडीदारापासून भावनिक आणि शारिरीकदृष्ट्या लांब राहत असतील तर त्या दुसऱ्याच पुरुषासोबत भावनिक आणि रोमँटिक संबंधांचा विचार करू लागतात. अशा प्रकारची भावना अनेक वेगवेगळ्या परिस्थितींमधून निर्माण होऊ शकते, जसे की साथीदार सतत प्रवास करत असेल, जोडीदार जास्त वेळ काम करत असेल किंवा जोडीदाराला कोणता आजार असेल.
2. कमी सन्मान
जेव्हा एखाद्या महिलेला अपेक्षित तितका आदर मिळत नसल्यास ती बाहेरील लोकांकडून तितका आदर मिळवण्याचा प्रयत्न करते. याच गोष्टीमुळे ती बाहेरील लोकांकडे जास्त आकर्षित होते.
3. भावनिक गरजा
आपल्या भावनिक गरजा पूर्ण होत नसल्याने महिला त्यांच्या पतींची फसवणूक करत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. संबंध शारीरिक असो किंवा भावनिक, स्त्रीला दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमळ संवाद, सहानुभूती, आदर, कौतुक, पाठिंबा हवा असतो जो तिला तिच्या सध्याच्या नातेसंबंधातून मिळत नाही.
4. अपेक्षा पूर्ण होत नसल्यास नात्यात दुरावा
जेव्हा जोडीदार पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करत नाही तसेच, त्यांच्या प्रत्येक गरजा आणि इच्छा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. याशिवाय, काही लोक त्यांच्या जोडीदारावर भूतकाळातील संबंधांमुळे रागावू शकतात आणि सूड म्हणून ते फसवणूक करू लागतात.
ADVERTISEMENT
