Crime News : चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात घडलेल्या गौतम मौर्य हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे. दिलावरपूर गावात 31 जुलै रोजी भरदिवसा गौतम मौर्य या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी अनेक तास चक्का जाम आंदोलन केले होते. हल्ल्यानंतर घटनास्थळीच मुख्य आरोपी समीर अली हा जमावाच्या ताब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी समीर अलीसह त्याचे वडील आणि भाऊ अशा एकूण चार जणांना अटक केली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान, कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली
गौतम संबंधित युवतीला त्रास
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी चौकशी, उपलब्ध पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रमाची सांगड घातली. त्यातून अश्वनी नावाच्या आणखी एका व्यक्तीची भूमिका समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्येमागे प्रेमसंबंध हे प्रमुख कारण होते. गौतम मौर्य आणि समीर अली या दोघांचेही एकाच युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गौतम संबंधित युवतीला त्रास देत होता, तिचे कथितपणे ब्लॅकमेलिंग करत होता आणि तिचा भाऊ अश्वनी यालाही धमकावत होता. ही संपूर्ण बाब संबंधित युवतीने तिच्या भावाला आणि समीर अलीला सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं, नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट
गौतमला मार्गातून हटवण्यासाठी अश्विनीने समीरला उसकवलं
पोलिसांच्या आरोपानुसार, त्यानंतर अश्वनीने समीर अलीला गौतमला कायमचा मार्गातून हटवण्यास कथितपणे प्रवृत्त केले. याच कथित कटानुसार समीर अलीने गौतमवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अश्वनीची भूमिका स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावर हत्येसाठी चिथावणी देणे आणि कट रचण्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
या प्रकरणाबाबत एसपी सिटी देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून अश्वनीचा सहभाग समोर आला. त्याने समीर अलीला हत्येसाठी कथितपणे प्रवृत्त केले आणि संपूर्ण कटात सहभाग घेतल्याचे तपासातून उघड झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संपूर्ण घटनाक्रमातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे. पोलिसांकडून उपलब्ध पुरावे आणि चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












