लातूर : महाराष्ट्रातील लातूर शहरात 16 जूनच्या रात्री म्हाडा कॉलोनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. 50 रुपयांच्या सुपारीच्या उधारीवरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाली, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
गाडीतून सामान उतरवताना भरधाव कारने उडवलं, अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांची नावं समोर
पान-सुपारीच्या 50 रुपयांसाठी वाद घातला
पोलीस उपायुक्त रंजीत सावंत यांनी सांगितलं की, म्हाडा कॉलोनीच्या मुख्य गेटजवळ बालाजी गायकवाड यांचा पानाचा ठेला आहे. 16 जून रोजी शहजाद शक्तो आणि अब्बास करतो हे दोन तरुण तिथे पान-सुपारी खायला आले. पान टपरी चालकाने 50 रुपये पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तसंच पान टपरीचालक बालाजी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याच वादातून संतप्त होऊन बालाजी आणि त्यांचे नातेवाईक गणेश सूर्यवंशी रात्री 9:30 वाजता आरोपींच्या घरी गेले, पण तिथे कुलूप होतं.
'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?
रस्त्यात पुन्हा वाद, कोयत्याने हल्ला
बालाजी आणि गणेश सुर्यवंशी हे संतापलेल्या अवस्थेतच तिथून परत निघाले. येताना रस्त्यात शहजाद आणि अब्बास दुचाकीवरून येताना दिसले. दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. संतप्त झालेल्या आरोपींनी कोयत्याने गणेशच्या छातीत आणि बालाजीच्या हातावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर बालाजीवर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
