2 साडू अन् पत्नीचं अफेअर, पतीला विष देऊन संपवण्याचा प्लॅन अन्...शेवटी काय घडलं?

मुंबई तक

29 Jul 2026 (अपडेटेड: 29 Jul 2026, 02:26 PM)

UP Crime News : हरदोईमध्ये लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत पत्नीने जेवणातून विष देऊन पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

UP Crime News

UP Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

2 साडू अन् पत्नीचं अफेअर

point

पतीला विष देऊन संपवण्याचा प्लॅन अन्...शेवटी काय घडलं?

UP Crime News : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिलग्राम कोतवाली हद्दीत लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत एका नवविवाहित महिलेवर पतीला जेवणातून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित पतीने स्वतः पत्नीविरोधात अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळून आपली हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी विवाहबाह्य संबंध असल्याचा दावाही त्याने केला आहे. या तिघांनी संगनमताने आपल्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप पीडिताने केला असून, पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानंतर घटनेच्या 21 दिवसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : कोल्हापूर : माजी सरपंच महिलेचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, शेवटी गोठ्यात केला मर्डर

पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी विवाहबाह्य संबंध, शेवटी भयानक कट 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांधामऊ येथील 28 वर्षीय संगम कुमार यांचा विवाह 24 नोव्हेंबर 2025 रोजी कानपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. संगम कुमार यांनी आरोप केला आहे की, लग्नापूर्वीपासूनच त्यांच्या पत्नीचे तिच्या दोन सख्ख्या साडूंशी म्हणजेच मनोज कुमार आणि उमाशंकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. या संदर्भात त्यांनी पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. पत्नी त्या दोघांबाबत कोणतेही बोलणे ऐकून घेण्यास तयार नव्हती, असा दावाही पीडिताने आपल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा : बीड : तू मला का बोलत नाहीस? विळ्याने हल्ला करत विचारणा, नंतर थेट तरुणाची बॉडी सापडली

जेवणात विषारी पदार्थ मिसळून मारण्याचा कट 

पीडिताच्या म्हणण्यानुसार, 7 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पत्नीने तयार केलेल्या जेवणामध्ये तिच्या साडूंशी सांगण्यावरून विषारी पदार्थ मिसळून तो त्याला खायला दिला. जेवण केल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याचवेळी मनोज कुमार आणि उमाशंकर तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्नीला सोबत घेऊन घटनास्थळावरून निघून गेल्याचे पीडिताने म्हटले आहे. या तिघांनी मिळून आपली हत्या करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप संगम कुमार यांनी केला आहे.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर कुटुंबीयांनी संगम कुमार यांना हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. 7 जुलै रोजी दुपारी 12:50 वाजल्यापासून ते 8 जुलै रोजी सकाळी 11:45 वाजेपर्यंत त्यांच्यावर आकस्मिक वैद्यकीय विभागात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा जीव वाचला असून अद्यापही त्यांच्यावर औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी आणि दोन्ही साडूंविरोधात तक्रार दिली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या निर्देशानंतर बिलग्राम कोतवाली पोलिसांनी आरोपी पत्नी तसेच मनोज कुमार आणि उमाशंकर यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.