Viral Video : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीने तिच्या व्यवसायिक प्रियकराला फोन केला आणि त्याला मंदिरात एकटे भेटण्यास सांगितलं. प्रियकर भेटण्यासाठी गेला असता, पुढे जे काही झालं, त्यामुळे तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तरुणीचे नाव शालू ( वय 20 ) असे आहे. तर तिच्या प्रियकराचे नाव अनमोल (वय 22) असे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी
प्रेयसीने आपल्या प्रियकराला फोनद्वारे संपर्क करुन एका मंदिरात भेटण्यासाठी बोलवले. त्यावेळी तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्यासोबत मोठं कांड झालं. मंदिरातच शालू रडू लागली आणि माझ्याशी लग्न कर असं बोलू लागली होती. तु माझ्याशी गेली तीन वर्षे प्रेमसंबंधात आहेस. दोन वेळा गर्भपातही केला, मला समाजात कसलाही आदर नाही. मी माझ्या हक्कांसाठी लढत आहे. त्यानंतर असंख्य लोकांसमोर तिनं त्याला भांगेत सिंदूर लावण्यास सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
अनमोल मधेशिया हा नगर पंचायत सुकरैली येथील रहिवासी आहे. शालू तिच्या आईसोबत सुकरौली-बढाया रस्त्यावर त्याच्या घरापासून 500 मीटर अंतरावर भाड्याच्या घरात राहते. शालूचे वडील शंभू शर्मा हे गुजरातमध्ये मजुरीचं काम करतात. शालू ही 12 वीची विद्यार्थीनी आहे. अनमोलचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. शालू ही अनेकदा त्याच्या दुकानात जात होती. त्यानंतर त्यांची एकमेकांसोबत चांगली ओळख झाली. दोघांचे एकमेकांशी बोलणं सुरु झालं, नंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं.
सोमवारी सायंकाळी शालूने उशीरा अनमोलला मंदिरात भेटण्यासाठी बोलावले. एकमेकांसोबत बोलताना गावकऱ्यांनी पाहिलं आणि शालूची आई सुनीता यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर शालूची आई सुनीता या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचं चित्र दिसून आलं. देवाला वाहिलेलं कुंकू आईनं शालूच्या हातात दिले. त्यानंतर ते कुंकू शालूने अनमोलला देवून आपल्या भांगेत भरण्यासाठी सांगितलं. त्यानंतर अनमोलने आईचे पाय धरले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शालू आणि अनमोलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांना घरी परत पाठवले. दुसऱ्याच दिवशी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले असता, कोतवाल राम सहाय चौहान यांच्या उपस्थितीत पंचायत झाली, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे सुमारे 20 ते 25 लोक उपस्थित होते. जर मुलीवर अन्याय होत असेल तर मुलावर आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करा. जर मुलीनं तसं काही केलं असेल तर मुलीवर गुन्हा दाखल करावा.
हेही वाचा : प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन् झाला मोठा कांड!
दरम्यान, या प्रकरणात तरुणीचं काहीही एक म्हणणं नाही. तिला फक्त अनमोलसोबतच राहायचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. अनमोलच्या कुटुंबियांना तरुणीबाबत भलताच संशय आहे. तरुणाला फरसवण्यासाठी हा डाव तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
