प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन् झाला मोठा कांड!

मुंबई तक

उदयपूरमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न ठरल्यामुळे तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन्...
प्रेयसीचं दुसरीकडेच ठरलं लग्न म्हणून शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलवलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेवटच्या भेटीसाठी प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवलं अन्...

point

प्रेयसीचं लग्न ठरल्यावर नाराज प्रियकाराने काय पाऊल उचललं?

point

प्रेयसी आणि प्रियकराच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Udaipur Crime: उदयपूरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न ठरल्यामुळे तिची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हॉटेलमध्ये बोलवून केली हत्या

उदयपूरच्या हिरण मगरी पोलीस स्टेशन परिसरातील परशुराम चौकात असलेल्या कासा गोल्ड हॉटेलमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. त्यांचं बोलणं सुरू असताना अचानक त्यांच्यात वाद झाला. रागात येऊन प्रियकराने आपल्या प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटलं आणि यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 

प्रेयसीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने आपल्याच हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तरुण तिथून पळून गेला. सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोली साफ करताना तिथे तरुणीचा मृतदेह दिसला आणि त्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. 

कोण होते ते प्रेयसी आणि प्रियकर? 

मृत तरुणीचं नाव निकिता त्रिवेदी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. निकिता मुळ ऋफभदेवची रहिवासी असून ती नर्सिंगच्या शिक्षणासाठी उदयपूरला राहत होती. तिथे ती आपल्या भावासोबत राहत होती. तसेच, आरोपी तरुणाचं विजय भोई असून तो उदयपूरच्या सेक्टर 3 चा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा: 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

इंस्टाग्रामवर झाली मैत्री अन्...

पोलीस अधिकारी भरत योगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि निकिताची इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री झाली होती आणि काही काळ त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. निकिताच्या घरच्यांना तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच मुलासोबत निकिताचं लग्न ठरवलं. यानंतर निकिताने विजयशी बोलणं बंद केलं. 

शेवटच्या भेटीत नको ते घडलं...

काही काळ गावी राहिल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा उदयपूरला आली. त्यावेळी विजयने निकिताला शेवटचं भेटण्याची इच्छा असल्याचं सांगत तिला परशुराम चौकातील हॉटेलमध्ये बोलवलं. त्यांच्या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि याच वादात विजयने निकिताची हत्या केली. 

हे ही वाचा: "माझा भाऊ डॉन, हाफ नाही तो डायरेक्ट फूल मर्ड....", दारूच्या नशेत पोरींचा भर रस्त्यात राडा

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेज आणि आयडीच्या मदतीने आरोपी विजयचा तपास केला. सध्या तो हॉस्पिटलमध्ये दाखल असून पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आहे. निकिताच्या नातेवाईकांच्या रिपोर्टनंतर मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करुन कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp