Sunny Deol ला ‘गदर-2’ का बनवायचा नव्हता? बॉर्डर लव्ह स्टोरीवरही स्पष्टच बोलला…

रोहिणी ठोंबरे

• 11:53 AM • 06 Aug 2023

बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे.

Mumbaitak
follow google news

Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे. पहिल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणे हा चित्रपट यशस्वी आणि ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. (Why Sunny Deol didn’t want to make Gadar 2?)

हे वाचलं का?

सनी देओल ‘गदर 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत, अभिनेता सनी देओल वडील धर्मेंद्र, भाऊ बॉबी देओल आणि दोन्ही मुलं (करण आणि राजवीर) यांच्यासह त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर बॉलिवूडच्या समस्यांवर मन मोकळेपणाने बोलला.

‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात

सनी देओलला ‘गदर 2’ का बनवायचा नव्हता?

सनी म्हणाला, ‘मला ‘गदर 2′ बनवायचा नव्हता. पण कथा लिहिली होती. चित्रपट बनला. 22 वर्षांनंतर हा चित्रपट येत आहे. कुटुंबासोबत पाहता येणारा हा चित्रपट आहे. माझ्यासाठी तारा सिंग एक अशी व्यक्तिरेखा आहे जी प्रत्येक माणसाला बघायची आहे. सकीनाचे पात्र असे आहे की तिचे तिच्या पतीवर प्रेम आहे. तसंच, यात दोन पात्र आहेत, एक पाकिस्तानची आणि दुसरी भारताची. सगळ्या गोष्टी जोडून हा चित्रपट सांगतो की कुटुंब एकच आहे.’

‘मी ज्या प्रकारे अॅडव्हान्स बुकिंगबद्दल ऐकत आहे, त्यावरून असं वाटतं की हा चित्रपट हिट होणार आहे. लोक थिएटरमध्ये जाणार आहेत. चित्रपट एन्जॉय करणार आहेत. माझ्या मते, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तर लोकांना अ‍ॅक्शन आणि स्टोरीही पाहायला मिळेल. त्यांचे पूर्ण मनोरंजन होईल.’ असं सनी म्हणाला.

भारत-पाकिस्तान बॉर्डर लव्हस्टोरीवर तुमचं म्हणणं काय? गदरही यावरच आधारित आहे का?

‘लोक आजकाल अ‍ॅप्सच्या माध्यमातून भेटतात. यापूर्वी असे होत नव्हते. तंत्रज्ञान खूप बदललं आहे. त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. त्यावर टीका करू नये. मी टीव्ही न्यूज चॅनल्सवर चालणाऱ्या सीमा हैदर आणि अंजूच्या कथेशी जोडू शकलो नाही. हे पाहून मी कोणतेही मत बनवलेले नाही. आज प्रत्येक गोष्ट बातमी बनत चालली आहे, त्यामुळे सीमा हैदरची कहानीही माझ्यापुरती तितकीच मर्यादित आहे.’

Sharad Pawar vs Ajit Pawar : जयंत पाटील खरंच अमित शाहांना भेटले का?

सनीने 6 पॅक अ‍ॅब्स कधीच का फ्लॉंट केले नाहीत?

‘जेव्हा अभिनेते त्यांच्या छातीचे केस काढतात तेव्हा मला तर खूप लाज वाटते. आपला हिंदी चित्रपटसृष्टी आता हॉलिवूडकडे वाटचाल करत आहे. आपण स्वत:चा कोणताच चित्रपट बनवत नाही आहोत. अभिनेते त्यांच्या शरीराला फिट आणि 6 पॅक ऍब्ससह बनवतात फ्लाँट करतात हे मला पटत नाही.’

ड्रग्ज प्रकरणावर सनी म्हणतो…

‘बॉलिवूड हे सडलेले नाही, सडलेली माणसं आहेत. असे लोक सर्वत्र आहेत ज्यांना ड्रग्जचे व्यसन आहे. मग ते ग्लॅमर वर्ल्ड असो किंवा सामान्य माणूस. आपले अनेक अभिनेते ते घेतात पण ते लोकप्रिय असल्यामुळे ते चर्चेत राहतात. या गोष्टी मला योग्य वाटत नाहीत.’

धर्मेंद्र अभिनयात नसते सनी कुठे असता?

जिथे माझे वडील होते, तिथे आम्ही गेलो असतो. माझ्या वडिलांनी जे केले ते मी केले असते. वडील अभिनयात नसते, तर मीही नसतो. माझे वडील जेव्हा अभिनय करायचे, तेव्हा आम्हीही तेच केले. वडिलांकडून मुलांमध्ये टॅलेंट येतो, त्यामुळे आम्हालाही ते मिळालं.

सनीचे नेपोटिझमवर स्पष्ट वक्तव्य!

‘मला असे वाटते की, नेपोटिझमवर ते लोक बोलतात जे स्वत: तणावात आहेत. ते हे का समजत नाहीत की लोक त्यांच्या मुलांसाठी काही करणार नाही तर कोणासाठी करणार? ज्यांच्याकडे प्रतिभा आहे तेच यशस्वी होतील. मी माझ्या मुलांना लॉन्च केले आहे. मी नाही तर कोण करणार?’

‘मी आणि माझे वडील दोघेही खूप लोकप्रिय आहोत पण, माझा मुलगा जे करेल ते तो स्वतःच्या प्रतिभेवर करेल. कधी कधी गोष्टी फिरतात. घराणेशाही आहे, खेळ बदलतात. त्यामुळे अनेकदा गोष्टी नकारात्मक होतात. मी माझ्या मुलांना एवढेच सांगतो की तुम्ही तुमच्या टॅलेंटवर पुढे जा. ते भविष्यात कामी येईल.’

अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी काय केलं कौतुक?

सनीला स्वत:च्या मुलाला ‘गदर 2’मध्ये पाहायचे होते

‘अनिल शर्माने आपल्या मुलांना ‘गदर 2′ मध्ये लॉन्च केले. माझा मुलगा करणने हे पात्र साकारावे अशी माझी इच्छा होती, पण मी माझ्या मुलाला घेऊन येईन असे त्यांनी सांगितल्यावर मी काही म्हटलं नाही. अशा पात्रासाठी माझा मुलगा सर्वोत्तम आहे असे मला वाटते. पण तो उत्कर्षला घेऊन आला तेव्हा मी काहीच बोललो नाही. करण आणि राजवीरच्या नशिबात जे काही आहे ते मिळेल, असा विचार केला.’

मुलांसोबत मित्रासारखं वागण्याला सनीचा विरोध का?

‘मला माझ्या वडिलांची भीती वाटते, माझा मुलगा मला घाबरतो. हा एक प्रकारचा आदर आहे. ही गोष्ट नसेल तर मुलं बिघडतात. वडिलांशी मैत्री झाली तर बाप आणि मैत्रीत फरक राहणार नाही.’

 

    follow whatsapp