Mumbai Vehicle Theft: मुंबईसारख्या शहरात दररोज अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद होत असते. अशातच, मुंबईमध्ये दररोज वेगवेगळ्या वस्तूंची किंवा वाहनांची चोरी झाल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. याप्रकरणी दररोज बऱ्याच तक्रारी दाखल होत असतात. विशेषत: वाहन चोरीबद्दल सांगायचं झाल्यास, या प्रकरणी दिवसाला 5 ते 6 तक्रारी नोंद होत असतात. यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
गेल्या चार महिन्यात मुंबईत वाहन चोरीचे सुमारे 703 गुन्हे नोंद झाल्याची बातमी मिळाली आहे. तसेच, मुंबईत दिवसाला 7 ते 8 वाहन चोरी होत असल्याचं ऐकायला मिळतं. या अशा घटनांमुळे मुंबईकरांच्या डोक्याचा ताप वाढत आहे.
आता अशाप्रकारे चोरलेली वाहने नेमकी जातात तरी कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.
हे ही वाचा: नवरा टेरेसवर झोपला होता, 3 पोरांच्या आईनं प्रियकराला बोलावलं, रुममधून आवाज आला अन्...
चोरलेली वाहने कुठे जातात?
खरंतर, मुंबईतून चोरी केल्या जाणाऱ्या गाड्या या बहुतेक मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी नेण्यात येतात. तसेच, बहुतांश वेळा चोरी केलेल्या गाड्यांचाच वापर गुन्हे घडवून आणण्यासाठी केला जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
हे ही वाचा: नवरा टेरेसवर झोपला होता, 3 पोरांच्या आईनं प्रियकराला बोलावलं, रुममधून आवाज आला अन्...
वाहन चोरीमध्ये चोरलेल्या दुचाकी गाड्यांचे पार्ट्स भंगारात विकण्यात येतात. वेगवेगळ्या गॅरेजमध्ये देखील अशा पार्ट्सची कमी भावात विक्री केली जाते. बऱ्याचदा चोरी केलेल्या दुचाकींना बनावट म्हणजेच खोटे क्रमांक लावून त्या सोशल मीडियाचा वापर करुन विकत असल्याच्या सुद्धा घटना घडल्याचे समोर आले आहे.
चोरलेल्या वाहनांची अशी होती विक्री
तसेच, वाहनांची चोरी करणारी टोळी ही अनेकदा भंगारातील दुचाकींचे इंजीन नंबर लावत त्या विकतात. इतकेच नव्हे तर भंगारातील दुचाकी अगदी कमी भावात म्हणजेच 2 ते 5 हजारांमध्ये ग्राहकांकडून खरेदी करून अगदी तशाच दुचाकी शोधून त्यांची चोरी करण्याऱ्या सुद्धा अनेक टोळ्या पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
