देवेंद्र फडणवीसांनी मांडला पंचामृत अर्थसंकल्प, नेमकं काय आहे पंचामृत ध्येय?

मुंबई तक

09 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:51 PM)

अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल. पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी

पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल.

पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल.

पंचामृत 3: भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास हे सरकारचे तिसरे ध्येय असेल.

पंचामृत 4: रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा हे सरकारचे चौथे ध्येय असेल.

पंचामृत 5: पर्यावरणपूरक विकास हे सरकारचे पाचवे ध्येय असेल.

पाहा संपूर्ण बजेट एका क्लिकवर

    follow whatsapp