Sakinaka Rape Case : विरोधकांनी सरकारवर चिखलफेक करू नये-संजय राऊत

मुंबई तक

• 09:31 AM • 11 Sep 2021

मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातल्याची घटना घडली. या महिलेवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसंच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांनी […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातल्याची घटना घडली. या महिलेवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसंच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करून सरकारवर चिखलफेक करू नये असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला, तिच्यासोबत पाशवी कृत्य झालं. तिला रूग्णालयात आणलं गेलं तेव्हाच तिची अवस्था खूपच नाजूक होती. जी घटना घडली ती अत्यंत धक्कादायक घटना आहे. मुंबईत महिलांना सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातल्या सुरक्षित शहरांमध्ये मुंबईचं नाव येतं. मात्र साकीनाका भागात जी घटना घडली त्यातल्या आरोपीलाही अटक करण्यात आली आङे. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र या प्रकरणाचं विरोधकांनी राजकारण करू नये, गोंधळ उडवून सरकार चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशा प्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात. महिलेचा जबाब नोंदवता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्यात. मात्र पोलिसांनी आता मुख्य आरोपीला पकडलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणावर विरोधी पक्ष सरकारवर आरोप करत आहे. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपीला जी कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे हीच आमचीही भावना आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीने हा खटला चालला पाहिजे. या घटनेची तुलना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी केली जाते आहे. ही तुलना करायला हरकत नाही, या महिलेने जीव गमावला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना घडू नये म्हणून यासाठी सरकारला अधिक कठोर पावलं उचलावी लागतील आणि ती उचलल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

साकीनाका भागत अत्यंत वाईट आणि माणुसकीला काळीमा फासणारी क्रूर घटना घडली. या घटनेत महिलेव बलात्कार झाला. या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    follow whatsapp