बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुका जाहीर होताच स्थानिक राजकारणात चांगलाच राजकीय तापमान वाढले आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होणार का? या चर्चेला आता अधिकच उधाण आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही नगरपरिषदांवर शिवसेनेची सत्ता असून, या वेळी मात्र भाजप आणि शिवसेना युतीबाबत अजूनही निर्णय झाले नाही.
ADVERTISEMENT
भाजप-शिवसेनेची युतीवरून आरोप-प्रत्यारोप
दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांवर युती संदर्भात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. बदलापूर भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे म्हणाले की, 'आम्ही युतीसाठी इच्छुक आहोत', मात्र शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजप आमदारांना थेट ओपन चॅलेंज देत म्हटले आहे की, 'बदलापूरात आम्ही एकहाती सत्ता आणू शकतो.' भाजपकडून युतीचे संकेत दिले जात असताना शिंदे गटाकडूनही लवचीक भूमिका घेतली गेली तर, दोन्ही पक्षांमध्ये मनोमिलन होणार का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
हे ही वाचा>> '...तर शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू', खासदार नारायण राणे आक्रमक, कोकणचं गणित मांडलं
यासंदर्भात बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर आरोप करत म्हणाले की, 'भाजपा आणि शिवसेना हे मित्र पक्ष बदलापूर नगरपालिकेत 2005 वगळता कधीही एकत्र निवडणूक लढवली नाही, त्यांच्याकडे तसेच शिवसेनेमध्येही भरपूर पदाधिकारी आहेत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. इच्छा असताना तरीसुद्धा युतीच्या प्रस्ताव स्वतः मी माजी मंत्री कपिल पाटील यांच्याकडे ठेवला होता त्यानंतर कपिल पाटील यांनी मला बोलवून चर्चा केली.'
युतीच्या फार्म्युला ठरलेला होता त्या अगोदरच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेऊन अजित पवार गटाचे आशिष दामले यांच्या जागा जाहीर करत कामाला लागायचा आदेश दिला.
'2014 साली या नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, माझे 24 नगरसेवक निवडून आलेले होते. आताही या नगरपालिकेवर एक हाती सत्ता आणू शकतो त्या अनुषंगाने मी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले. इथे एक हाती सत्ता येईल असे लक्षात आल्यानंतर भाजपच्या स्थानिक लोकांनी तुमच्या माध्यमातून आम्हाला आव्हान करतात की, आम्ही युतीचे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. ही खोटी गोष्ट आहे.'
हे ही वाचा>> राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं का? पण घडलं! मग आता का घडू शकत नाही? तानाजी सावंतांचं वक्तव्य
'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. त्यामुळे युती नाही झाली तर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. मला सुद्धा कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. नक्कीच जे पुनरावृत्ती 2014 साली झाली होती त्याच पद्धतीने मी या निवडणुका लढण्याचा ठरवलेले आणि नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचे एक हाती सत्ता आम्ही या नगरपरिषेवर आणणार आहोत.'
'मोठ्या फरकाने नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून आल्यानंतर पुन्हा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे मुख्य नेते आणि नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूरला विकासाकडे नेणार आहोत. शिवसेनेचे कमीच कमी या नगरपालिकेवर 36 जागा निवडून येतील शिवसेनेचे पहिले 9 नगरसेवक होतो त्यानंतर 14 नगरसेवक झाले, 14 च्या नंतर 17 झाले आणि 2015 ला 25 नगरसेवक झाले. प्रत्येक निवडणुकीत नगरसेवक वाढत चालले आहेत आणि नक्कीच या निवडणुकीत ही जागांमध्ये वाढ दिसेल.' असेही वामन मात्रे यांनी सांगितले.
बदलापूर भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले की, 'बदलापूर नगरपालिका हा विकासाकडे जाणारी नगरपालिका आहे, राजकारण कमी आणि विकास जास्त हा इथला लोकांच्या आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे असतील किंवा माजी मंत्री कपिल पाटील असतील या दोघांनी मिळून गेल्या पंधरा वर्षात बदलापूरचे विकास केले आहेत. आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा टार्गेट केला आहे.'
'प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा पंचायत सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आली पाहिजे असा टार्गेट करून सहा महिन्यापासून काम करतोय. विकासाच्या मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी लढाई करणार आहोत.'
पुढे राजेंद्र घोरपडे म्हणाले की, 'आमदार किसन कथोरे असतील कपिल पाटील असतील यांनी नेहमीच दोन पाऊल मागे जाऊन युतीचा हात पुढे केलेल्या आहे. आणि प्रमाणिक इच्छा असते लोकसभाला युती व्हावी विधानसभाला आहे, मग नगरपालिकेत का नको युती? त्यामुळे गावाचे वातावरण चांगला राहतं. दुसरं असं की विकासालाही चालना मिळत असते.'
'खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका झाल्या तर कधीही चांगल्या असतात. हा दृष्टिकोन घेऊन आमचे नेते मंडळी दोन हात पुढे करून युती करताय. परंतु आज तुम्हाला सांगू इच्छितो की, भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता येण्याकरीता, आम्हाला मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट करायचा आहे त्याकरिता 2015 ला झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन-तीन सीट कमी असतील परंतु 1600 मत आम्ही विरोधी पक्षांपेक्षा जास्ती आहोत. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची थेट नगराध्यक्ष निवडणूक जिंकण्याकरिता आम्हाला कुठल्याही अडचण येणार नाही असा मला वाटते.' असं ते यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT











