Lok Sabha 2024 : भाजपला ‘या’ 129 जागांची चिंता! मोदी पुन्हा सत्तेत कसे येणार?

भागवत हिरेकर

• 12:30 PM • 19 Jan 2024

मोदींनी तिसऱ्या टर्मची घोषणा केली आहे. 2024 च्या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा आणि 51 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचे लक्ष्य भाजपचे आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये जागा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 400 चे लक्ष्य गाठणे सोपे जाणार नाही.

There are five states in South India, Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala. There are 129 Lok Sabha seats in these states.

There are five states in South India, Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu and Kerala. There are 129 Lok Sabha seats in these states.

follow google news

Bjp Plan for Lok Sabha 2024 Election : ‘अबकी बार 400 पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा हुंकार भरत भाजपने लोकसभा 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केलीये. भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने काम सुरू केलं आहे. पण, लोकसभेच्या 129 जागा आहेत, ज्यांची चिंता भाजपला आहे. त्या कोणत्या आहेत आणि त्यामुळे भाजपचे ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं मिशन कसं प्रत्यक्षात येईल, हे जाणून घ्या…

हे वाचलं का?

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतून एक बाब समोर आली, ती म्हणजे भाजपची ताकद आहे, ती उत्तर भारतात. पण, उत्तर भारतावर विसंबून तिसऱ्यांदा सत्तेत येता येईल, या भरवशावर भाजप नाही, असेच दिसत आहे. कारण दोन आठवड्यात पंतप्रधान मोदींचे दक्षिणेत दोन दौरे झालेत.

१४ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी दिल्लीतील तामिळनाडूतील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्या घरी पोंगल सण साजरा केला. आंध्र प्रदेशचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी दोन आठवड्यात दुसऱ्यांदा केरळमध्ये होते. त्यामुळे मोदी-भाजपची नजर दक्षिणेवर जास्त असल्याचे दिसत आहे.

भाजपची दक्षिणेवर ‘स्वारी’

दक्षिणेतील राज्यात भाजपला फारसं यश मिळालेलं नाही. सातत्याने पक्ष या राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आला आहे. देशात दोन वेळा सत्ता मिळवूनही भाजपला दक्षिणेत आपली पकड मजबूत करता आलेली नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ ही पाच राज्ये दक्षिणेत येतात. पाच राज्यात मिळून लोकसभेच्या १२९ जागा आहेत.

हेही वाचा >> सोलापुरात PM Modi च्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला; म्हणाले, “लहानपणी…”

समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या 129 जागांपैकी 84 जागांवर भाजपची नजर आहे. 84 असे मतदारसंघ आहेत, जिथे भाजपला जास्त मतदान मिळालेलं नाही, पण मोदींची लोकप्रियता वाढलेली आहे. कर्नाटकात २५, तेलंगणात १०, केरळात ५ लोकसभा मतदारसंघात भाजपने ताकद लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या कलामुळे भाजपला केरळात कमळ फुलण्याची आशा आहे.

केरळात काय आहे रणनीती?

केरळमधील गुरूवयूरमध्ये पंतप्रधान मोदींनी मल्याळम सुपर स्टार आणि भाजप नेता सुरेश गोपींच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणार आहे. सुरेश गोपी हे राज्यसभा सदस्य आहे. २०१९ मध्ये सुरेश गोपींनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले.

गोपी यांना २८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. २०१९ मध्ये भाजपने केरळात २० पैकी १५ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवले होते. सर्व उमेदवार पराभूत झाले, पण भाजपला १३ टक्के मतदान झालं. १० मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना दीड ते तीन लाखांपर्यंत मतं मिळाली होती. २ मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भाजपच्या आशा वाढल्या आहेत.

पुन्हा मोदी सरकार, भाजपची घोषणा

भाजपने देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार अशी घोषणा केली आहे. २०२४ मध्ये ४०० पेक्षा जास्त जागा आणि ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे लक्ष्य आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये भाजप मजबूत आहे. या राज्यात भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. या राज्यांमध्ये जागा वाढण्याऐवजी आहे त्या जागांमध्येच घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील १२९ जागाशिवाय भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य सोप्पं नाही.

हेही वाचा >> भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा दक्षिण भारतात मिळाल्या होत्या. काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला २९ जागा मिळाल्या होत्या, पण त्यापैकी २५ जागा या एकट्या कर्नाटकातील होत्य. तेलंगणात ४ जागा मिळाल्या होत्या. मोदी लाट असूनही भाजपला केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये खाते उघडता आले नाही. ७३ जागा द्रमुक, वायएसआरसीपी, भारत राष्ट्र समिती यासारख्या प्रादेशिक पक्षांनी जिंकल्या होत्या.

कर्नाटकात भाजपला झटका… टेन्शन वाढलं

भाजप ही चिंता सतावत आहे की, कर्नाटक आणि तेलंगणात २९ जागा मिळाल्या होत्या. पण, अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात काँग्रेस सत्तेत आली. भाजप कर्नाटकात दुसऱ्या, तर तेलंगणात तिसऱ्या नंबर राहिली. २०१४ पासून देशात मोदी लाट असूनही भाजपची दक्षिणेत अशी अवस्था आहे. त्यामुळेच भाजपचं टेन्शन वाढलं आहे.

दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व

दक्षिण भारतातील राजकारणात प्रादेशिक पक्षांचंच वर्चस्व आहे. काँग्रेसजवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगली आघाडी आहे. दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष एकेक करून वेगळे झाले आहेत. कर्नाटकात जेडीएस परत भाजपसोबत आली असली, तरी तेलंगणात बीआरएस, आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युती आधीच तुटली आहे. भाजप दक्षिणेतील राज्यात प्रभावी असलेल्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे.

    follow whatsapp