नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (18 एप्रिल) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात देशातील महिलांची माफी मागितली. त्यांनी काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षावर त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्याचा थेट आरोप केला.
ADVERTISEMENT
'जेव्हा महिला आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी आला, तेव्हा विरोधकांनी तो रोखला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोधात मतदान केले आणि विधेयक नामंजूर झाले.' पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या पक्षांनी विविध कारणे देऊन देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेहमीच महिला आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि अशा प्रयत्नांमध्ये नेहमीच अडथळे निर्माण करते.'
पंतप्रधान मोदींनी का मागितली माफी?
पंतप्रधान म्हणाले की, 'सर्व प्रयत्न करूनही हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.' त्यांनी देशातील माता आणि भगिनींची माफी मागितली. ते म्हणाले की, 'भारतातील महिलांची शक्ती दडपली गेली आणि त्यांची स्वप्ने निर्घृणपणे चिरडली गेली.'
हे ही वाचा>> पंतप्रधान मोदी LIVE: संबोधनाच्या सुरुवातीलाच मोदी संतापले, 'या' विषयावरून प्रचंड चिडले!
विरोधी पक्षांवर कोणते आरोप केले?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जेव्हा काही पक्ष राष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देतात, तेव्हा त्याचे परिणाम महिला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. जेव्हा हा प्रस्ताव संसदेत फेटाळला गेला, तेव्हा काही विरोधी पक्षांनी जल्लोष केला आणि टाळ्या वाजवल्या.'
पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले की, 'ही केवळ टाळ्यांची दाद नव्हती, तर महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि आत्मसन्मानावर केलेला थेट हल्ला होता.'
हे ही वाचा>> PM मोदी जेव्हा-जेव्हा देशाला संबोधित करतात तेव्हा-तेव्हा... आजही देणार आश्चर्याचा मोठा धक्का?
महिलांना काय इशारा?
पंतप्रधान म्हणाले की, 'देशातील महिला ही घटना कधीही विसरणार नाहीत. जेव्हा कधी हे नेते त्यांच्यात जातील, तेव्हा त्यांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महिलांच्या हक्कांना विरोध केल्याबद्दल या पक्षांना निश्चितपणे शिक्षा होईल आणि जनता त्यांना धडा शिकवेल.'
संविधानाचा का केला उल्लेख?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'हे विधेयक रोखून विरोधकांनी केवळ महिलांचाच नव्हे, तर राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या भावनांचाही अपमान केला आहे.' ते म्हणाले की, 'हे विधेयक 21 व्या शतकातील भारतीय महिलेला एक नवी संधी आणि नवी भरारी देण्याचा प्रयत्न होता.'
ADVERTISEMENT











