Uddhav Thackeray : 'ही बीजेपी नाही,तर बाबर जनता पार्टी आहे, ही सगळी फसवणूक सुरू आहे. या गद्दारांची हिंमत आहे का जर उद्या हाच गद्दार लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिरात झालेल्या चोरीबाबत उत्तर विचारण्यासाठी हा गद्दार धाडस करणार आहे का?', असा तिखट उद्धव ठाकरे यांनी सवाल केला. जे धाडस आपले शिवसेनेचे खासदार करतील, तेच खासदार हे गद्दार करतील का?' असा प्रश्न करत त्यांनी धाराशिव मतदारसंघात 28 जून 2026 रोजी उपस्थितांना संबोधित केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय वृद्धाचा बलात्कार.. भयंकर घटना
'त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय, मराठी माणूस संपवायचाय...'
पुढे ते म्हणाले की, 'त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय, मराठी माणूस संपवायचाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभीमान भिनवलेला आहे, देशप्रेम संपवायचं आहे. त्यांना महाराष्ट्रातून गुजरातला न्यायचं आहे. गेल्या दहा वर्षत या धाराशिवमध्ये किती कारखाने आले? एक तरी कंपनी आली? सर्वकाही गुजरातला दिलंय, नाशिकचा होणाऱ्या कुंभमेळ्याचे कॉन्ट्रॅक्ट देखील गुजरातला दिलेलं आहे.'
'हिंदुहृदय सम्राट हे एकच होते ते बाळासाहेब ठाकरे'
'कारण महाराष्ट्रातील एकही स्वाभिमानी शिल्लक ठेवायचा नाही. हा स्वाभिमान कधी संपेल, जेव्हा शिवसेना संपले आणि शिवसेना संपेल तेव्हा हे सर्व काही होईल, त्यासाठीच ही फोडाफोडी सुरू आहे. ठाकरे का नाही संपत? कारण हिंदुहृदय सम्राट हे एकच होते ते बाळासाहेब ठाकरे. ते जोवर तुमच्या मनात आहेत तोवर तुम्ही त्यांना संपवू शकत नाहीत, आम्ही जोडले गेलेली माणसं आहोत.'
'चाळीस आमदार फोडले शिवसेना संपली, नऊ खासदार आले. परत त्यातील सहा खासदार फोडले. शिवसेना फोडली मग समोर काय आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही आमदार-खासदारांमध्ये नाही, ती शिवसेना लोकांच्या घरोघरी पोहोचली आहे. नुसती मनकी बात बोलून चालत नाही, दिल की बात बोलावी लागते.'
'भाव वाढवला आणि तो (ओमराजे) देखील गेला'
'बाकीच्या 5 जणांचं ठरलं होतं, इकडचा एक फक्त उरला होता. भाव वाढवला आणि तो (ओमराजे) देखील गेला. आपले दोन खासदार ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यांना घटनेचं पुस्तक दिलं. त्या घटनेच्या पुस्तकात दोन तृतीयांश बहुमत जरी तिकडे गेले तरीही पक्षात विलीन होऊ शकत नाहीत याचा अधिकार हा पक्षाला असतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : फडणवीसांबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, परभणीच्या सभेत काय म्हणाले?
'शेतकऱ्याच्या हमीभावाला दाम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व'
'पाकव्याप्त काश्मीरमध्ये तुम्ही तुम्ही सैन्य घुसवा हा उद्धव ठाकरे तुम्हाला पाठिंबा देतो. तुम्हाला याच्या त्याच्या पाठिंब्याची गरज लागणार नाही. फक्त कोणी पीक विम्याचा प्रश्न केला की, जय श्री राम... शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? जय श्री राम... समाधानच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? जय श्रीराम... हे हिंदुत्व मान्य नाही. आम्ही पण प्रभू रामाला मानतो, आमच्या हृदयात राम, शेतकऱ्याच्या हमीभावाला दाम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे,' असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT











