Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर बुधवारी सुरक्षामंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर CCS ची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यात पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. अशातच आता याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीतून नेमकं कोणतं ठोस पाऊल उचणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Weather update : राज्यात 'या' भागात वाहणार थंड वारे, तापमानाचा पारा झटकन घसणार!
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अशातच आता, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीत एक मोठा कार स्फोट झाला. या हल्ल्याचे जैश-ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे संबंध हे थेट पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी जोडले जात आहेत. अशातच देशाच्या पंतप्रधानांनी कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, दिल्लीतील स्फोट हा आत्मघातकी होता, ज्यात कारचा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्करांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : Delhi Blast: तपासात उघड झाली अत्यंत मोठी माहिती, ‘ती’ गोष्ट झाली नसती तर अत्यंत भयंकर…
तसेच दिल्लीत दहशत निर्माण करणाऱ्यांचे थेट संबंध हे पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी कुठेतरी जोडले जात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधून दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करणार आहेत, अशी घोोषणा केली आहे.
पंतप्रधान कारवाई करणार?
नरेंद्र मोदींनी नुकतच केंद्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. राष्ट्राच्या सुरक्षेच्या बाबींवर महत्त्वाची चर्चा झाली. तसेच महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले होते. बैठकीत ऑपरेशन सिंदूरचा आराखडा तयार करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, मोदी सरकारने कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचा गुन्हा मानण्याचा निर्णय घेतला, जर दहशतवादी हल्ला पाकिस्तानशी जोडल्यास पुन्हा ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आले.
ADVERTISEMENT











