‘ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही, ते…’, बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (UBT) आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. या नव्या आघाडीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून, त्याच्या भविष्यातील परिणामांबद्दलही सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील या नव्या आघाडीबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. […]
ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (UBT) आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. या नव्या आघाडीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून, त्याच्या भविष्यातील परिणामांबद्दलही सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील या नव्या आघाडीबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या आघाडीलाबद्दल भूमिका मांडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल, तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही. त्यांचा तो अधिकार आहे, मात्र उद्धवजींना स्वतःच्या पक्षाचे आमदार टिकवता आले नाहीत.”
“तिथेच या हराम**** राजकीय चिता पेटेल, हीच बाळासाहेबांना आदरांजली” -सेना