कल्याण : ‘मी शिवसेना बोलतेय’ देखावा पोलिसांनी हटवला; विजय तरुण मंडळानं घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीबरोबर एका गोष्टीची हमखास चर्चा होते, ती म्हणजे देखावे. वेगवेगळे विषय घेऊन गणेश मंडळांकडून देखावे साकारले जातात. यंदा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गणरायाचं आगमन झालं. त्यामुळे कल्याणमधील विजय तरुण मित्रमंडळाने शिवसेनेतील बंडखोरीबद्दलचा चलचित्र देखावा साकारला. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी कारवाई केली असून, साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विजय तरुण मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतलाय.

कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. ‘पक्ष निष्ठा’ असा विषय घेऊन चलचित्र देखावा साकारण्यात आला. ‘मी शिवसेना बोलतेय’ इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात होती.

पोलिसांनी जप्त केलेला विजय तरुण मंडळाचा देखावा कसा होता?

या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्षाच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात, अशा आशयाचा हा देखावा आहे. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला. कल्याण पोलिसांनी देखाव्यावर आज (३१ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी देखाव्याची सगळं साहित्य जप्त केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ganesh Chaturthi 2022 : अशा प्रकारे करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, घरी नांदेल सुख, समृद्धी आणि शांतता

‘मी शिवसेना बोलतेय’ देखावा जप्त; विजय तरुण मंडळ पोलिसांच्या कारवाईवर काय म्हणालं?

देखावा जप्त करण्याच्या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले, “मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशही आहे. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवलं नव्हतं. ताज्या विषयावर भाष्य केलं होतं, तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे”, साळवी यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

पोलिसांच्या कारवाईविरोधात न्यायालयात विजय तरुण मंडळ जाणार

“आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून, या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही”, असं विजय साळवी यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी जुळून आला ‘हा’ योग, अशी करा बाप्पाची पूजा

विजय तरुण मित्रमंडळाकडून 59 वर्षांपासून साजरा केला जातो गणेशोत्सव

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळ स्थापन होऊन 59 वर्षे झाली आहेत. 59 वर्षांपासून या मंडळाकडून गणेश उत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी या मंडळाकडून ताज्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट हा ताजा विषय असल्याने या विषयावर देखावा साकारण्यात आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT