Maharashtra APMC Election Result LIVE: महाराष्ट्रात बाजार समितींवर कोणाचा झेंडा?, निकालाचा धुरळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva
maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva
social share
google news

मुंबई: राज्यभरात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. काही बाजार समितींच्या निवडणुका काल पार पडल्या असून त्यांचा निकाल आज (29 एप्रिल) जाहीर होत आहे. तर काही बाजार समितींच्या निवडणुका या 30 एप्रिल रोजी होणार आहेत. काल पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींवर सत्ता मिळविणं हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं बनलं आहे. त्यामुळेच आता या सगळ्यात राजकीय पक्ष देखील आपलं लक्ष घालत आहे. ज्यामुळे या निवडणुकांना देखील अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. (maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva)

जाणून घ्या बाजार समितींच्या निवडणुकीचे नेमके निकाल

  • रामटेक (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल

नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटाच्या सर्व चार जागांवर भाजप समर्थित पॅनेलला यश. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि स्थानिक काँग्रेस नेते आणि सुनील केदार यांचे विरोधक गज्जू यादव यांनी संयुक्तपणे शेतकरी विकास पॅनल लढवले होते.

काँग्रेस नेते सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या पॅनलचा पराभव.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • मंगळवेढा

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार समाधान आवताडे गटाचे वर्चस्व

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांचे पॅनल सर्व जागा जिंकून एक हाती सत्ता प्रस्थापित केली.

ADVERTISEMENT

यामध्ये तेरा जागा त्यांनी बिनविरोध जिंकल्या होत्या पाच जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक झाल्यानंतर रात्री मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीमध्ये पाचही जागा आमदार समाधान आवताडे यांच्या गटांनी जिंकलेले मंगळवेढ्यात अवताडे गटाकडून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

ADVERTISEMENT

  • बुलढाणा

-काल 5 बाजार समितिच्या आलेल्या निकलमधे
मेहकर मधे शिंदे गटाला 11, मविआ – 7
मलकापूर बाजार समितीमध्ये भाजपा 17,
देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी 15,

-बुलढाणा बाजार समितीमध्ये
म्हाविकास आघाडी 12,
भाजपा – सेना – 6
खामगांव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी 15 जागेवर विजयी झाले.

  • बारामती

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी.

  • सांगली

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने खाते खोलले. आणि पहिला विजय संपादन केला आहे. हमाल तोलायतदार गटातून वसंतदादा शेतकरी पॅनेलचे मारुती बाळू बंडगर विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 1028 मते पडली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा त्यांनी 475 मतांनी पराभव केला आहे.

  • बीड

बीडसह अंबाजोगाई, गेवराई, केज आणि परळी बाजार समिती मतमोजणीला सुरुवात.

बीड, अंबाजोगाई, परळी, केज, गेवराई व वडवणी या सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 28 एप्रिल रोजी एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. या सर्व सहा बाजार समित्यांसाठी एकूण 14 हजार 961 मतदारांपैकी 14 हजार 328 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या 5 बाजार समित्यांची मतमोजणी सुरूवात झाली आहे.

  • छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा वर..
महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी..
कैलास उकीरडे विजयी – ग्रामपंचायत सर्वसामान्य.
महाविकास आघाडीचे महेंद्र कोतकर विजयी..
महाविकास आघाडीचे पारडे जड..

  • चंद्रपूर

जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात… सर्वात आधी सोसायटी गटाची होणार मतमोजणी आणि त्यानंतर ग्रामपंचायत, व्यापारी आणि हमाल गटाची होणार मतमोजणी होईल.

  • अमरावती

अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी पडली भारी; भाजपचा सुफडा साफ, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा जल्लोष

अमरावती जिल्ह्यात सहा बाजार समितीची निवडणूक काल झाली. यामध्ये अमरावती वगळता अन्य पाच बाजार समितीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली.आगामी विधानसभेची रंगीत तालिम या अर्थाने झालेल्या या निवडणुकीत महाआघाडी समर्थित पॅनलले सर्वच 5 पैकी पाचही बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.

यामध्ये तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व 18 उमेदवार निवडून आले, चांदूर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप, मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार गटाचे 10 संचालक विजयी झाले आहेत.

नांदगाव खंडेश्वरमध्ये अभिजित ढेपे व अंजनगाव सुर्जी मध्ये काँग्रेसने विजय मिळवला या निवडणुकीत भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव झालेला आहे. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला.

जिल्ह्यातील पाचही बाजार समितीत भाजप व शिंदे गटाला यश मिळालं नाही. त्या तुलनेत यशोमती ठाकूर यांनी आपला गड राखला विजया नंतर यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांन समवेत गुलालांची उधळण करत मोठा जल्लोष केला

  • भोर

पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा
-भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता
-काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी
-काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी गड राखला
-निवडणूकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र लढूनही काँग्रेसच वरचढ

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे बाजी मारून 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. शिवसेना शिंदे, ठाकरे दोन्ही गट त्याचबरोबर भाजप असे सर्व विरोधी पक्ष एकत्र करून राष्ट्रवादीने संग्राम थोपटे यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, सुरूवातीला मोठ्या चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र, एकतर्फी झाल्याचे दिसून आले. आमदार संग्राम थोपटे यांनी निवडणूक जिंकून पुन्हा एकदा भोर तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भोरमध्ये मोठा जल्लोष केला.

  • खेड (पुणे)

पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँगेसने बाजी मारली आहे. रात्री उशिरा आलेल्या निकालानुसार स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील या ठिकाणी विजयी झाले आहेत. इथे राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय एकत्र येवून थेट लढत होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर सर्वपक्षीयांना 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

ठाकरे शिवसेना 3, भाजप 2, तर काँग्रेस ला 1 जागा मिळाली आहे. व्यापारी मतदार संघातील 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. इथे शिंदे गटाला मात्र भोपळाही फोडता आला नाही.

  • लातूर

लातूर जिल्ह्यातील दहापैकी चार ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज पार पडल्या असून त्यांचा निकाल हाती आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत आपला झेंडा कायम ठेवला आहे 18 पैकी 18 जागावरती काँग्रेसने विजय मिळवत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने हा विजय मिळवला आहे.

उदगीर येथेही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या 18 पैकी 18 जागांवरती काँग्रेस अधिकृत पॅनल ने विजय प्राप्त केला आहे.

औसा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र 18 पैकी 16 जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना यश मिळाले आहे.

चाकूर कृषी बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 10 तर महाविकास आघाडीला आठ जागांवरती विजय मिळाला असून चाकूर कृषी बाजार समिती वर भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखले आहे.

  • दिंडोरी

दिंडोरीमध्ये निवडणुकीत महायुतीच्या परिवर्तन पॅनलची बाजी

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत 18 पैकी 11 जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन दिंडोरी बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे.

  • घोटी

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा गुळवे राज आले आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत लोकनेते गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलने विरुद्ध असलेल्या शेतकरी परिवर्तनाच्या पॅनलचा धुवा उडवत सोळा जागांवर दणदणीत यश संपादित केले आहे.

  • लातूर

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर काँग्रेसचा एकतर्फी विजय.. भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरती काँग्रेसने एक हातीसत्ता मिळवत आपला झेंडा कायम ठेवला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपच्या अंतर्गत वाद त्यांना भोवला असून गेल्यावेळी जेवढ्या जागा होत्या त्या देखील भाजपला यंदा राखता आल्या नाहीत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने 18 पैकी 18 जागावरती विजय मिळवत लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपली एक हाती सत्ता कायम ठेवली आहे. रमेशअप्पा कराड आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यातील वाद हा भाजपच्या जागा कमी करण्यास कारणीभूत ठरला असल्याची चर्चा मतदारांमध्ये बोलली जात आहे.

  • वर्धा

वर्धा जिल्ह्याच्या बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा, भाजपाचा सुपडा साफ

वर्धा जिल्ह्यातील 4 कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले असून चारही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा विजय झाला आहे तर भाजपाचा सुपडा साफ झाला आहे..

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्पित पॅनलने विजय मिळविला असून एका जागेसाठी ईश्वरचिठ्ठी टाकली जाणार आहे .

देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 ही जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचे वर्चस्व बघायला मिळत आहे.

आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 7 जागेचा निकाल हाती आला असून या 7 जागेवर काँग्रेस ,राष्ट्रवादी गटाच्या पॅनलने विजय मिळवला आहे 11 जागेचा निकाल बाकी आहे.

सिंदी रेल्वे सेलू बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी 15 जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटने 15 जागेवर विजय मिळविला आहे तर भाजपाच्या गटाकडे केवळ 3 जागा आल्या आहेत.

त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर जिल्ह्याच्या चारही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सरशी बघायला मिळत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT