अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईचा आदेश निघाला! शेतकऱ्यांना हेक्टरी किती पैसे मिळणार?
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. याचा शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. आज मदतीसंदर्भातील आदेश राज्याच्या मदत आणि व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला. मान्सूनच्या पावसाने यंदा महाराष्ट्रातील विविध भागांना जोरदार तडाखा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भापासून मराठवाडा, […]
ADVERTISEMENT

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. याचा शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. आज मदतीसंदर्भातील आदेश राज्याच्या मदत आणि व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला.
मान्सूनच्या पावसाने यंदा महाराष्ट्रातील विविध भागांना जोरदार तडाखा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भापासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ते कोकणापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता.
मुसळधार ते अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आणि याचा फटका शेती क्षेत्राला बसला होता. पिकं वाहून गेल्यानं आणि नासाडी झाल्यानं मदतीची मागणी केली जात होती. राज्य सरकारने पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत केली जाईल, असं सांगत मदत जाहीर केली होती.
अखेर मदत जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रात एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचं नुकसान झाले असून, 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.