“उद्धव ठाकरेंना भाजप पाठवणार पुस्तकं”; आशिष शेलारांनी सांगितला इतिहास

मुंबई तक

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही थेट आरएसएसवर निशाणा साधला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसचं योगदान सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलारांनी ठाकरेंना उत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी इतिहासाचा अभ्यास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही थेट आरएसएसवर निशाणा साधला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसचं योगदान सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय.

भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलारांनी ठाकरेंना उत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. नपेक्षा आमच्याकडून जुन्या मैत्रीचा दाखला म्हणून आम्ही जी काही पुस्तकं देऊ, ती नक्की वाचावीत”, असा सल्ला शेलारांनी दिलाय.

“डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात सक्रीय होते की नाही याचं उत्तर त्यांना मिळेल. केशव हेडगेवार हे स्वातंत्र्य अभियानात सक्रीय होते. अजून माहिती असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातल्या वर्गांमध्ये महात्मा गांधींनीही भेट दिली होती”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray: वीर सावरकरांबाबत आमच्या मनात नितांत आदर, आम्हाला कुणी शिकवू नये

हे वाचलं का?

    follow whatsapp