"धारावीत बदल होईल... आधी आम्ही लोकांना घरांच्या चाव्या देऊ आणि नंतरच...', प्रणव अदानींचं मोठं विधान

मुंबई तक

Adani on Dharavi: धारावी पुनर्विकासाबाबत प्रणव अदानी म्हणाले की तेथे 2 लाख घरे बांधली जातील आणि लोकांना प्रथम त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या दिल्या जातील, त्यानंतर धारावीचा पुनर्विकास केला जाईल.

ADVERTISEMENT

pranav adani on dharavi redevelopment we will hand over keys to new homes first and only then will we vacate slum
प्रणव अदानी
social share
google news

नवी दिल्ली: अदानी समूहाच्या कृषी आणि तेल आणि वायू विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी यांनी 'अजेंडा आज तक' या विशेष कार्यक्रमात मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल उघडपणे सांगितले. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, 'हा जगातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे आणि त्याचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न 40 वर्षांपासून सुरू आहेत, परंतु आता त्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. धारावीत बदल होणारच.'

धारावी प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देताना प्रणव अदानी म्हणाले की, तेथे 2 लाख घरे बांधली जाणार आहेत. अदानी पुढे म्हणाले की, सरकारच्या मते, 2000 सालापूर्वी तेथे राहणाऱ्या धारावीकरांना तिथेट घरं दिली जातील, तर 2000 सालानंतर धारावीत आलेल्यांना आलेल्यांना मुंबईत इतरत्र घरे दिली जातील.

'प्रथम, आम्ही घराच्या चाव्या देऊ, नंतर आम्ही विकास सुरू करू'

प्रणव अदानी म्हणाले की, 'लोकांमध्ये सर्वात मोठी भीती ही आहे की, जागा रिकामी केल्यानंतर त्यांना पुन्हा घर मिळेल की नाही. हीच समस्या समजून घेत, अदानी समूह प्रथम घरं बांधत आहे, त्यानंतर लोकांना चाव्या दिल्या जातील आणि नंतर धारावीत पुनर्विकासाचे काम सुरू होईल.'

हे ही वाचा>>  Uddhav ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्ला, ‘तुम्ही अदानीचं बूट चाटताय’

'धारावी मुंबई शहराच्या मध्यभागी आहे आणि येथे सर्व आधुनिक सुविधा आहेत. पुनर्विकासाचा एक भाग म्हणून, मेट्रोपासून ते इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांपर्यंत सर्व काही येथे विकसित केले जाईल. धारावीचा विकास मल्टी-मॉडल पद्धतीने केला जाईल. एक संपूर्ण आराखडा तयार आहे आणि त्यावर काम सुरू आहे.' असं प्रणव अदानी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp