Sindhudurga: कुडाळमध्ये का तैनात केलंय दंगल नियंत्रण पथक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भरत केसरकर, कुडाळ

Maharashtra-Karnataka Border Dispute: बेळगावमधील हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ काल (6 डिसेंबर) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या. महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमधील मराठी भाषिकांना भेटण्यास विरोध आणि महाराष्ट्र पासिंग गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात फोडल्या. त्याचे पडसाद काल सायंकाळी उशिरा सिंधुदुर्गातही उमटले आहेत. (why has the riot control team been deployed in kudal maharashtra karnataka border dispute)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एसटी डेपोत थांबलेल्या बेळगाव-कुडाळ या कर्नाटक बसवर मनसैनिकांनी ”जय महाराष्ट्र, जय मराठी” अशी अक्षरे रंगवून आपला निषेध नोंदवला होता. यावेळी हा फक्त निषेध व्यक्त केला असून परिस्थिती जर सुधारली नाही तर कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरु देणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे आज सकाळी कुडाळहून बेळगावकडे जाणारी कर्नाटक बस मार्गस्थ झाली नाही. ही बस कुडाळ डेपोत उभी असून येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे.

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं काम केलंय पठ्ठ्यांनी, कर्नाटकला ‘असा’ शिकवलाय धडा!

ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज ठाकरेंचं पत्र

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कर्नाटक सरकारला थेट जाहीर पत्र लिहून इशाराच दिला आहे. पाहा राज ठाकरेंनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय.

ADVERTISEMENT

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून यावा यासाठी पुन्हा कुणाकडून तरी प्रयत्न सुरू झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे उघड दिसतंय. पण महाराष्ट्रातून कोण याला खतपाणी घालतं आहे? हे सरकारने पाहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरू आहेत ते तातडीने थांबवा.

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचाराने सुटायला हवा. पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवाना हे सांगणं आहे की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आणि आपल्या जे हवंय तेच आपण करायचं.

Raj Thackeray: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला खतपाणी कोण घालतंय?

अचानकपणे चहुबाजूंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातो आहे. हे प्रकरण साधंसोपं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळी जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून ही कृती व्हावी अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने या प्रश्नात वेळीच लक्ष घालावं आणि हा वाद चिघळणार नाही हे पाहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहे तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन्ही राज्यांमधला बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.

– राज ठाकरे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT