Uday samant : “एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं जुळू नये म्हणून तिथं काही माणसं काम करत होती”
-राकेश गुडेकर, रत्नागिरी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरूच असून, आता माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्र लिहिलं असून, या पत्रात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जुळू नये, म्हणून काही लोक काम करत होती, असा […]
ADVERTISEMENT

-राकेश गुडेकर, रत्नागिरी
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरूच असून, आता माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर पत्र लिहिलं असून, या पत्रात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जुळू नये, म्हणून काही लोक काम करत होती, असा गौप्यस्फोट केला आहे.
उदय सामंत (Uday Samant) यांनी मतदार आणि शिवसैनिकांना लिहिलेलं पत्र
प्रिय, शिवसेना मतदार बंधू -भगिनी आणि शिवसैनिक बंधू भगिनी,
सस्नेह जय महाराष्ट्र …