Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, Osmanabad चं नावही बदललं!

मुंबई तक

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name of city aurangabad as chhatrapati sambhajinagar and osmanabad as dharashiv proposal of the state government has been approved by the central government)

दरम्यान, याबाबतच्या निर्णयाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्याचा ज्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे त्याचा जीआर देखील फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

यासोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

संभाजीनगर नामांतर : जे सोबत आले नाहीत, त्यांची वाट लागणार – इम्तियाज जलील

हे वाचलं का?

    follow whatsapp