Ganpat Gaikwad : ‘रॉकेल ओतून जाळून घेईल..’, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील BJP आमदार संतापला!

मिथिलेश गुप्ता

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्द्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. तसंच आत्मदहनाचा इशाराही दिला.

ADVERTISEMENT

eknath shinde thane district bjp mla ganpat gaikwad farmer midc officer disput self immolation
eknath shinde thane district bjp mla ganpat gaikwad farmer midc officer disput self immolation
social share
google news

कल्याण: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे (Thane) जिल्हातील एका भाजपच्या आमदाराचा (BJP MLA) अंबरनाथ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यावरून प्रचंड वाद झाला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. शिवाय जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर मी स्वतःच अंगावर रॉकेल ओतून जाळून घेईल अशी धमकीच त्यांनी यावेळी दिली. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना अधिकारीही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. (cm eknath shinde thane district bjp mla ganpat gaikwad farmer midc officer disput self immolation)

अंबरनाथ-बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एकेरी मार्ग गेल्या दोन महिन्याभरापासून बंद आहे. तर दुसरा एकेरी मार्ग अरुंद असल्याने या रस्त्यावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी एमआयडीसी आणि बाधित शेतकऱ्यामध्ये रस्त्याच्या भूसंपादनाच्या वादातून होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या 50 वर्षांपासून जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यावरून तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी एकेरी मार्ग बंद केला आहे. मात्र, रस्ता बंद करूनही एमआयडीसी प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमिन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, बुधवारी बंद केलेला एकेरी मार्ग खुला करण्यासाठी एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास घटनास्थळी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड पोहचले. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप करत सदरचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचा इशारा दिला.

अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे 50 वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादीत केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एका कागदी चुकीमुळे रस्ता आणि पाईपलाईन ज्या जागेतून टाकण्यात आली आहे, त्याऐवजी बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा पेचात इथले शेतकरी अडकले.

हे वाचलं का?

    follow whatsapp