Cyclone Biparjoy In Gujarat : प्रचंड हाहाकार! चक्रीवादळ धडकल्यानंतर काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

cyclone Biparjoy hit the Jakhau port in Gujarat. Poles broken-trees uprooted, roads turned into ponds-electricity of 940 villages
cyclone Biparjoy hit the Jakhau port in Gujarat. Poles broken-trees uprooted, roads turned into ponds-electricity of 940 villages
social share
google news

Cyclone Biporjoy Landfall : अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) संध्याकाळी गुजरातमधील जाखाऊ बंदरावर धडकले. यानंतर राज्यात 115-125 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने प्रचंड विध्वस घडवला. वादळ धडकल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शेकडो झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब तुटल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. समुद्राला लागून असलेल्या सखल भागात पाणी तुंबल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. गुजरातमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ : गुजरातमध्ये आतापर्यंत काय घडले?

– गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता बिपरजॉय जखाऊ बंदरावर धडकले. रात्री 12 वाजता कच्छमध्ये चक्रीवादळ पूर्णपणे जमिनीवर आले. या वेळी ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
– वादळाच्या तडाख्यानंतर मांडवीमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले. जखाऊ मांडवी रोडवरही अनेक झाडे उन्मळून पडली.
– पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळानंतर गुजरातमधील भावनगरमध्ये गुरे वाचवताना पिता-पुत्राचा मृत्यू झाला. अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरे पाण्यात अडकली होती. त्यांना वाचवताना दोघांचा बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा >> ‘बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद ‘, शिंदे-फडणवीसांतील सुप्त संघर्षावर शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य

– गुजरातचे मदत व पुनर्वसन आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, वादळामुळे सुमारे 22 लोक जखमी झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. 23 जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. 524 झाडे पडली असून, काही ठिकाणी विजेचे खांबही पडले आहेत. 940 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
– कच्छचे जिल्हाधिकारी अमित अरोरा यांनी सांगितले की, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. सर्वत्र पाऊस पडत आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात 200 खांब आणि 250 झाडे उन्मळून पडली. पाच तालुक्यांतील 940 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ADVERTISEMENT

Video >> Cyclone Biporjoy in Mumbai : मुंबईत उसळल्या 13 फूट उंच लाटा

– अरोरा यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यापासून 10 किमीपर्यंतचा परिसराला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कच्छमधील सुमारे 52,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर 25 हजार गुरेही उंच ठिकाणी हलवण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mira Road: ‘मी नपुंसक आहे, आणि…’, सरस्वती वैद्यची हत्या करणारा मनोज साने असं का म्हणाला?

– मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल चक्रीवादळाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरूवारी रात्री उशिरा गांधीनगर येथील स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये पोहोचून वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

– चक्रीवादळामुळे रेल्वे सेवेला फटका बसला आहे. ज्या भागांना बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे, त्या भागात येणाऱ्या आणि सुटणाऱ्या 99 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. आणखी 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 3 गाड्या कमी अंतरापर्यंत सोडल्या गेल्या.

16-17 जून रोजी धो धो पाऊस होणार, हवामान विभागाचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव अजून कमी झालेला नाही. चक्रीवादळामुळे संपूर्ण गुजरातमध्ये 16-17 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 16 जून रोजी सौराष्ट्र, कच्छ, उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. तर 17 जून रोजी आग्नेय राजस्थान आणि लगतच्या उत्तर गुजरातमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग भरवणार धडकी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 16 जून रोजी गुजरातच्या अनेक भागात 90-100 किमी वेगाने वारे वाहतील. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी येथे जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
– समुद्रातही उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
– 16 जून रोजीही पाऊस आणि वादळामुळे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह 9 राज्यांना तडाखा

बिपरजॉय चक्रीवादळामुळे केंद्रापासून राज्य सरकारांपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क आहेत. NDRF च्या 17 तुकड्या आणि SDRF च्या 12 तुकड्या गुजरात मध्ये तैनात आहेत. त्याचबरोबर नौदलाची 4 जहाजे सध्या सज्ज ठेवण्यात आली आहेत. किनाऱ्यालगत राहणाऱ्या 74,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT