‘मन की बात’साठी लग्न ठेवले होल्डवर; नवरदेवाच्या मागणीने उपस्थित बुचकळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

100th episode of Prime Minister Narendra Modi's 'Mann Ki Baat' program should be listened to and listened to before the wedding rituals
100th episode of Prime Minister Narendra Modi's 'Mann Ki Baat' program should be listened to and listened to before the wedding rituals
social share
google news

राजस्थानच्या भिलवाडामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इथे लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाने अशी काही मागणी केली की उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले होते. लग्नाच्या विधींपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाचा 100 वा भाग ऐकायचा आणि ऐकवायचा आहे, अशी मागणीच वराने केली. नवरदेवाची ही मागणीही लगेच पूर्ण झाली आणि मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली. यावर लग्नासाठी आलेल्या सर्व लोकांनी आणि वधू-वरांनी पंतप्रधानांची ‘मन की बात’ ऐकली. त्यानंतरच लग्नाचे उर्वरित विधी पार पडले. (100th episode of Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’ program should be listened to and listened to before the wedding rituals)

त्याचं झालं असं की, भिलवाडा येथील एका खासगी रिसॉर्टमध्ये एक विवाह समारंभ होता. या दरम्यान, नवरदेव असलेल्या ऋषभने लग्नाचे विधी सुरु असतानाच एक अट घातली. तो म्हणाला की, विधी थांबवावे आणि पंतप्रधान मोदी यांची ‘मन की बात’ ऐकली जावी. ऋषभची ही मागणी ऐकून सुरुवातीला सर्वांनाच आश्चर्य वाटले. पण तो आपल्या मागणीवर ठाम राहिल्यान लगेचच मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली. त्यावर कुटुंबीय आणि नातेवाईकांसह सर्वांनी पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम ऐकला. पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम संपला, त्यानंतर बाकीचे विधीही पूर्ण झाले.

हे ही वाचा : वाढदिवसाला मिळाला पुनर्जन्म; 20 तास ढिगाऱ्याखाली दबलेला तरुण म्हणाला…

कार्यक्रमानंतर विधी पार पडले :

ऋषभ म्हणाला की तो पहिल्या एपिसोडपासून मन की बात कार्यक्रम ऐकत आहे. त्याने आजपर्यंत एकही एपिसोड चुकवला नाही. आज 100 वा भाग होता आणि आज लग्नही होते. पण मन की बातचा 100 वा भाग चुकवायचा नव्हता. म्हणूनच पुन्हा LED ची व्यवस्था करण्यात आली आणि मग सर्वांनी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला. त्यानंतर बाकीचे विधीही पूर्ण झाले. दुसरीकडे, ऋषभची पत्नी म्हणाली की, ‘मन की बात’  मधून पंतप्रधानांचे शब्द सर्वांपर्यंत पोहोचतात. लोकही त्यांचे म्हणणे ऐकतात. मलाही मन की बात ऐकायला आवडते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ ने 100 भाग पूर्ण :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ने 100 भाग पूर्ण केले आहेत. ‘मन की बात’च्या थेट प्रक्षेपणासाठी देशभरात 4 लाख बूथ लेव्हल सेंटर्सची स्थापना करण्यात आली होती. ‘मन की बात’ दरम्यान, पंतप्रधानांनी ‘चरैवेती, चरैवेती, चरैवेती’ म्हणजे चालत राहा, चालत राहा, चालत राहा असा संदेश दिला. ते म्हणाले की आज आम्ही चरैवेती चरैवेती याच भावनेने ‘मन की बात’चा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. प्रत्येक प्रसंगात देशवासीयांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे.

हे ही वाचा : VIDEO : स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला हार्टअटॅक,सातवीच्या विद्यार्थ्यांने…

सद्भावना, सेवाभाव आणि कर्तव्यभावनेने पुढे गेलो : पंतप्रधान

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मन की बात’चा प्रत्येक भाग पुढील भागासाठी जमीन तयार करतो. ‘मन की बात’ नेहमीच सद्भावना, सेवा आणि कर्तव्याच्या भावनेने पुढे जात आहे. सामूहिक प्रयत्नाने सर्वात मोठा बदल घडवून आणता येतो यावर माझा अढळ विश्वास आहे. या वर्षी, जिथे आपण स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पुढे जात आहोत. त्याचबरोबर ते G-20 चे अध्यक्षपदही भूषवत आहेत. शिक्षणासोबतच वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होण्याचे हे देखील एक कारण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT