Holi 2024: होळीच्या मुहूर्तावर 100 वर्षानंतर पहिल्यांदा चंद्रग्रहण, भारतात लागणार सुतक काळ?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chandra Grahan 2024 Date time In India : यावर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandragrahan 2024) आज धूलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी लागणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. या दिवशी देशभरात होळीचा (Holi 2024) सणही साजरा केला जाणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योगायोग घडल्याचे ज्योतिषी सांगतात. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषांच्या दृष्टिकोनातूनही ती महत्त्वाची मानली जाते. फाल्गुन पौर्णिमेला आलेले हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. हे चंद्रग्रहण कुठे दिसणार आहे आणि त्याचा सूतक काळ भारतात वैध आहे की नाही हे जाणून घेऊया. (Holi 2024 Chandra Grahan 2024 know about Sutak Kaal in India or not)

 

चंद्रग्रहण कधी लागणार? 

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी 25 मार्च रोजी लागणार आहे. चंद्रग्रहण सकाळी 10:24 ते दुपारी 03:01 पर्यंत राहील. म्हणजेच चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास ३६ मिनिटे असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्रग्रहण कुठे दिसेल?

होळीच्या दिवशी होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण ईशान्य आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, रशिया, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर अशा ठिकाणांहून दिसणार आहे.

 

ADVERTISEMENT

भारतात सुतक कालावधी असेल का?

25 मार्च 2024 चे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी देखील वैध नाही. सुतक काळात देवी-देवतांची पूजा किंवा विधी यासारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. पण या चंद्रग्रहणात तुम्हाला तसे करणे बंधनकारक नाही.

ADVERTISEMENT

 

होळीवर चंद्रग्रहणाचा किती परिणाम होतो?

ज्योतिषांच्या मते या चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय रंग खेळू शकाल. चंद्रग्रहणाचा सुतक काळही भारतात वैध असणार नाही. त्यामुळे तुम्ही होळी तर खेळूच शकाल त्यासोबत दैनंदिन जीवनातील सर्व कामंही नक्कीच करू शकता.

 

चंद्रग्रहण काळात काय नाही केलं पाहिजे? 

  • चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाल्यानंतर मंदिरात पूजा करू नये. देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नका.

  • सुतक कालावधीनंतर घरी अन्न शिजवू नका. तसंच सुतक बनवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने घालावी.

  • चंद्रग्रहण काळात अन्न सेवन करू नका. या काळात रागावू नका. या चंद्रग्रहणाचा प्रभाव पुढील १५ दिवस टिकू शकतो.
  • चंद्रग्रहण काळात कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीत जाऊ नये. या काळात नकारात्मक शक्ती खूप प्रबळ असतात.
  • सुतक कालावधी सुरू झाल्यानंतर कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा जास्त असते असे म्हणतात.
  • चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाल्यानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका.

चंद्रग्रहण काळात काय केलं पाहिजे?

  • चंद्रग्रहणाच्या वेळी केवळ देवाच्या मंत्रांचा जप करावा, जे दहापट फलदायी मानले जातात.
  • चंद्रग्रहणानंतर शुद्ध पाण्याने स्नान करून गरिबांना दान करावे.
  • चंद्रग्रहणानंतर संपूर्ण घराची शुद्धी करावी. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात.
  • ग्रहणाच्या वेळी गाईंना गवत, पक्ष्यांना अन्न आणि गरजूंना वस्त्र दान केल्याने अनेक पुण्य प्राप्त होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT