Khichadi Scam : संजय राऊतांपर्यंत पोहोचलेला खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Khichadi Scam In Mumbai : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कथित 'खिचडी घोटाळ्याची' चर्चा जोरदार रंगली आहे. या कथित घोटाळ्यावरून सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसमधून हाकलपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी सोमवारी (8 मार्च) पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर (UBT) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ज्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवार म्हणून घोषित केले आहे ते अमोल कीर्तिकरच नाही तर संजय राऊतही 'खिचडी चोर' आहेत.' (Sanjay Nirupam's Serious Allegation Against Sanjay Raut What exactly is the Khichadi scam )

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोमवारी (8 मार्च) शिवसेना (UBT) नेते अमोल कीर्तिकर यांची कोरोना काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने खिचडी वितरणात कथित अनियमिततेच्या संदर्भात चौकशी केली. कथिक घोटाळ्यातील त्यांच्या भूमिकेची चौकशी त्यांच्याच मुंबईतील कार्यालयात सुमारे आठ तास झाली. या कथित घोटाळ्यासंदर्भात अमोल कीर्तिकरांच्या बँक खात्यात व्यवहार झाले ज्यामध्ये त्यांना खिचडी कंत्राटी फर्मकडून 1.65 कोटी रूपये मिळाल्याची माहिती आहे. 

काय आहे खिचडी घोटाळा?

'खिचडी घोटाळा' हे नाव खिचडी वितरण योजनेवरून आले आहे. जे कोरोना काळात (एप्रिल 2020) गरजू रोजंदारी मजूर आणि गरिबांना अन्न देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केले होते. लॉकडाऊन दरम्यान मजूरांना आणि गरिबांना कोणतंही काम नव्हतं. यामुळे त्यांना अन्न मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना खिचडी पुरवली. याचे कंत्राट देताना जो पाच हजार रुपयांपासून फूड पॅकेट बनवू शकतो त्यालाच हे कंत्राट देता येईल, अशी अट घालण्यात आली होती. याशिवाय स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था आणि कम्युनिटी किचन यांना कंत्राटे देऊन त्यांना यासाठी परवाने दिले जातील, असा निर्णय घेण्यात आला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नियम डावलून कंत्राट देण्यात आल्याचे आणि लाचही घेतल्याचे नंतर समोर आले. तपास यंत्रणेने सांगितले की, खिचडीच्या पाकिटांच्या पुरवठ्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 'फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस'च्या बँक खात्यात 8 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती (ज्यात 'खिचडी'चा करार होता). याशिवाय, कामगारांना जी 250 ग्रॅम खिचडी द्यायची होती, त्यापैकी केवळ 125 ग्रॅमच त्यांना देण्यात आली, याचा अर्थ खिचडीच्या वाटपातही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

भाजप नेत्याने केली होती तक्रार

या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केला होता. 2020 मध्ये कोरोना महामारीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही कंत्राटदारांना खिचडीचे कंत्राट देण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचा भाऊ आणि मुलीने लॉकडाऊनच्या काळात खिचडी पुरवठ्यासाठी कंत्राटदारांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणात संजय राऊत यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणातील आरोपी अमोल कीर्तिकर यांनी सांगितले की, सुरूवातीच्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते. काही व्यवहार झाले असले तरी त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी कृतीशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

सोमवारी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कीर्तिकर म्हणाले, 'मी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी मला पुन्हा फोन केला नाही, पण जेव्हा जेव्हा मला बोलावले जाईल तेव्हा मी सहकार्य करेन.

2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता

सप्टेंबर 2023 मध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. अन्य आरोपींमध्ये सुनील उर्फ ​​बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंट्सचे राजीव साळुंखे यांच्यासह काही कर्मचारी आणि फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस आणि स्नेहा केटरर्सचे भागीदार यांचा समावेश आहे. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त (नियोजन) आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर केंद्रीय अन्वेषण एजन्सी ईडीनेही कथित घोटाळ्याच्या संदर्भात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.

सूरज चव्हाणला मिळाले होते 1.35 कोटी रुपये

किरीट सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, बृहन्मुंबई महापालिकानेही काही नेत्यांच्या जवळच्या विक्रेत्यांना खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वितरण करण्याचे कंत्राट दिले होते. एफआयआरनुसार, शिवसेना (UBT) नेते सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांनी करारांवरून लाच घेतल्याचा आरोप आहे.

सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरे यांच्या जवळचा आहे. सूरजला ईडीने जानेवारीमध्ये अटक केली आहे आणि त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. चव्हाण याने एका कंत्राटदाराकडून 1.35 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे, जो त्याने कंसल्टन्सी फी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. सूरज चव्हाणने ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, लॉकडाऊनच्या काळात त्याने खाद्यपदार्थांची पाकिटे वाटण्याचे कंत्राट दिलेल्या फर्मला मनुष्यबळ पुरवले होते.

सूरज चव्हाणने कंपनीसोबत मनुष्यबळ पुरविण्याच्या कराराशी संबंधित कागदपत्रे ईडीचे समन्स प्राप्त झाल्यानंतर तयार करण्यात आल्याचे नंतर उघड झाले. कंत्राटदार कंपनीचे मालक आणि चव्हाण यांच्यातील संभाषण देखील शोधण्यात आले, ज्यामध्ये फर्मचा मालक चव्हाणला कराराच्या प्रतीमध्ये कोणत्या तारखा समाविष्ट करायच्या आहेत आणि आणखी काय लिहायचे आहे अशी विचारणा करत होता.

'संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार'- संजय निरुपम

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्याबाबत अनेक दावे केले आहेत. या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून त्यांनी संजय राऊत यांचे नाव घेतले आहे. ते म्हणाले की, 'राऊतने आपली मुलगी, भाऊ आणि जोडीदाराच्या नावावर पैसे घेतले आहेत. या खिचडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संजय राऊत आहे. सह्याद्री जलपानला खिचडी वाटपाचे 6 कोटींचे कंत्राट मिळाले होते, त्यासाठी राऊत यांच्या नातेवाईकांनी 1 कोटी रुपयांचे कमिशन घेतले होते.' असे गंभीर आरोप निरूपम यांनी केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT