Maharashtra : 'राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव', जयंत पाटलांचं महाराष्ट्राला पत्र
Jayant Patil Letter : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या जनतेला लिहिलं पत्र

सध्याच्या राजकारणाबद्दल व्यक्त केली चिंता

जयंत पाटील यांचे पत्र वाचा जसंच्या तसं
Jayant Patil Letter : गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू असून, राज्यातील जनतेला पाटलांनी एक आवाहनही केलं आहे. (Jayant Patil Letter people of Maharashtra)
जयंत पाटील यांनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे...
नमस्कार,
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अनेक महापुरुषांचा वारसा असणारे आपले महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंकृत राज्य आहे. या राज्यात आपण जन्मलो हे आपले भाग्य. अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.