"MPSC च्या प्रत्येक पदाचा रेट ठरलेला आहे, थेट पदांसाठी बोली लावून टाका"

मुंबई तक

MPSC result discrepancies : MPSC निकालातील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पुण्यात एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणी आणि मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

mpsc result discrepancies
mpsc result discrepancies
Google CTA

बातम्या हायलाइट

point

MPSC निकालातील गुणांवर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

point

पुण्यात विद्यार्थ्यांचा संताप, फेरतपासणीची मागणी

MPSC result discrepancies :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांच्या निकालांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालातील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत एकाच विषयाच्या दोन पेपरमध्ये मोठा फरक दिसून येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. उदाहरण म्हणून एका विद्यार्थ्याला भूगोलाच्या पेपर एकमध्ये 250 पैकी 121 गुण मिळाले, तर त्याच विद्यार्थ्याला भूगोलाच्या पेपर दोनमध्ये केवळ दोन गुण मिळाले आहेत. याचप्रमाणे समाजशास्त्राच्या एका विद्यार्थ्याला पेपर एकमध्ये 11, तर पेपर दोनमध्ये 100 गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा : रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ

विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली?

विद्यार्थ्यांनी निबंध आणि इंग्रजीच्या गुणांमधील तफावतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका विद्यार्थ्याला इंग्रजीच्या पेपरमध्ये 300 पैकी 67 गुण मिळाले असून, किमान 75 गुणांची आवश्यकता असल्याने तो पात्र ठरलेला नाही. मात्र, त्याच विद्यार्थ्याला निबंधाच्या पेपरमध्ये 250 पैकी तब्बल 195 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मते, एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या पेपरमधील गुणांमध्ये इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली, हा गंभीर प्रश्न आहे. एका विद्यार्थिनीने सांगितले की, तिला कटऑफपेक्षा 55 गुणांची आघाडी असूनही इंग्रजीच्या पेपरमध्ये 75 पैकी 74 गुण मिळाल्याने केवळ एका गुणाने अपात्र ठरवण्यात आले. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना एका-दोन गुणांच्या फरकामुळे पुढील प्रक्रियेपासून बाहेर पडावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय, "MPSC च्या प्रत्येक पदाचा रेट ठरलेला आहे, थेट पदांसाठी बोली लावून टाका", अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील एका विद्यार्थ्याने दिली. 

हेही वाचा : Personal Finance: मुलीच्या भविष्यासाठी SSY की PPF? जाणून घ्या कोणती योजना फायदेशीर