Ulhasnagar: भयंकर.. ‘ज्या बोटाने भाजपला मतदान केलं तेच बोट मी तोडलं, फडणवीसांना…’
ulhasnagar Crime: भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांना अटक न केल्याने एका व्यक्तीने आपल्या हाताचं बोट तोडल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये 20 दिवसांपूर्वी ननावरे दाम्पत्याने काही गुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने एक व्हिडीओ शूट केला होता. जो आता व्हायरल झाला आहे. त्यात त्याने साताऱ्यातील काही लोकांची आणि वकिलांची नावे घेऊन हे सर्व लोक त्याचा मानसिक छळ करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ननावरे दाम्पत्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. या घटनेला आज वीस दिवसांहून अधिक दिवस झाले तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ ननावरे यांच्या भावाने चक्क स्वत:च्या डाव्या हाताचं एक बोटच थेट मुळापासून कापून टाकलं. (ulhasnagar nanaware family suicide case man cut off his finger after not arresting people responsible for suicide of his brother and sister in law)
ननावरे यांच्या भावाने एक व्हिडीओ शूट केला असून त्यात त्यांनी तोडलेलं बोट दाखवलं आहे. स्वत:चं तोडलेले बोट घेऊन ते थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. जिथे त्यांनी टेबलावरच आपलं बोट फेकलं. ज्यामुळे एकच खळबळ माजली.
आपलं हे बोट आपण राज्य सरकारला पाठवत आहोत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शरीराचा एक-एक भाग कापून घेणार असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील अशेलेपाडा परिसरात नंदकुमार ननावरे हे कुटुंबासह राहत होते. सुमारे 20 दिवसांपूर्वी ननावरे यांनी पत्नीसह बंगल्याच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ननावरे यांच्या पत्नीचे नाव उर्मिला आहे. आत्महत्येनंतर काही दिवसांनी, एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये ननावरे यांनी सांगितले की, काही गुंड त्याला त्रास देत होते, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत.